ओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर पावले उचला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर अजून रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावले उचलायला हवीत, असे सांगत (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रॉस यांनीच ओमायक्रॉन व्हेरिएंटविषयी जगातील सर्व देशांना गंभीर इशारा दिला आहे.


जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती पसरू लागली आहे. एकीकडे काही शास्त्रज्ञ ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटइतका घातक नसल्याचे सूत्र मांडत आहेत, तर दुसरीकडे काहीजण अधिक काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत, पण या सर्वांनीच ओमायक्रॉनबाबत अधिक सखोल संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर आता “ओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर हीच योग्य वेळ आहे”, अशा शब्दांत डॉ. टेड्रॉस यांनी जगाला सतर्क केले आहे.


“जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहता त्याचा एकूणच कोरोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनला रोखायचे असेल, तर अजून रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावले उचलायला हवीत.”, असे टेड्रॉस यांनी म्हटले आहे.




आर काऊंटमुळे वाढली चिंता


कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव देशात झाला असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा ‘आर काऊंट’ १च्या अगदी जवळ पोहोचला आहे. ही बाब चिंता वाढविणारी आहे. मुंबई-पुणे-ठाण्यात, तर हा काऊंट १पेक्षा पुढे गेला आहे. आर व्हॅल्यू किंवा आर काउंट हा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संक्रमित झालेल्या लोकांची संख्या सांगते. देशात महामारी संपण्यासाठी आर काउंट १ पेक्षा कमी असला पाहिजे.




ओमायक्रॉनची भीती? लसीकरणात १६ टक्क्यांनी वाढ


जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे नागरिक लसीकरण केंद्रात जाऊन लस घेत आहेत. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली असली तरी त्याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे, मात्र ओमायक्रॉनबद्दल विविध बातम्या येऊ लागल्या तेव्हापासून देशात लसीकरणात वाढ झाली आहे. लसीकरण डेटावर नजर टाकल्यास असे दिसून येते की, गेल्या १३ दिवसांत त्याच्या मागच्या १३ दिवसांच्या तुलनेत दुसऱ्या डोसच्या वापरामध्ये जवळपास १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १२-२४ नोव्हेंबरदरम्यान ८,५४,८७,७६९ वरून २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान ९,९५,५४,१९२ पर्यंत वाढली आहे.

Comments
Add Comment

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर