कोळी बांधवांसाठी अद्यावत मार्केट उभारणार

  83

देवा पेरवी


पेण : ‘पेणमधील कोळी बांधवांसाठी भविष्यात अद्ययावत असे मच्छिमार्केट उभारणार’, असा संकल्प भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नुकताच येथे व्यक्त केला. पेणमधील कोळी बांधवांसाठीच्या नियोजित मच्छिमार्केटच्या कामाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते व नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती दर्शन बाफणा, नगरसेविका शेहनाज मुजावर, नगरसेविका देवता साकोस्कर, नगरसेविका अश्विनी शहा, नगरसेवक अजय क्षिरसागर, कोळीवाडा पंचकमिटी अध्यक्ष आदींसह कोळी बांधव उपस्थित होते.

रविशेठ पाटील यांनी सांगितले की ‘कोळी समाज अतिशय कष्टाळू असून येथील महिला वर्ग सकाळपासून मच्छीविक्री करीत असतो. अशा या कष्टकरी समाजासाठी एक सुसज्ज मार्केट बांधण्याचा आपला प्रयत्न असून लवकरच आपण हा मानस पूर्ण करू असे म्हणाले. नवीन मार्केटसाठी जागा, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आगामी काळात नगराध्यक्षा नक्कीच करतील. मी आपल्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध असून कधीही कोणती चूक होत असेल तर आपण नक्कीच माझ्या निदर्शनास आणून द्या. ती चूक नक्कीच सुधारली जाईल. मंत्री पदाच्या काळात सातपाटी सारख्या ठिकाणी केलेल्या विकास कामांची आठवण यावेळी रविशेठ पाटील यांनी उपस्थितांना सांगितली. राजकारण न करता समाजाच्या उन्नतीसाठी सर्व कोळी बांधवानी एकत्रित राहावे, एकसंघ राहावे असे आवाहन पाटील यांनी कोळी बांधवाना केले.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या