प्रभाग वाढीच्या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे

  82

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग वाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या विरोधात भाजपने याचिका दाखल केली आहे. गुरुवारी याबाबत सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबतच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.


राज्य सरकारकडून मुंबईतील ९ प्रभाग वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भाजपने याला विरोध करत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ डिसेंबरला होणार आहे.


दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्य सरकारने लोकसंख्या वाढीमुळे प्रभाग वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे.


तर कोविडच्या पार्श्वभूमीवर जनगणना न होता प्रभाग वाढ चुकीची असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर न्यायालयाने खुलासा मागितला असून आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, निकाल योग्यच लागेल असे याचिकाकर्त्या भाजप नगरसेविक राजेश्री शिरवाडकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भुजबळांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

"जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही.":  मुख्यमंत्री मुंबई:

टायगर मेमनच्या नातेवाईकांचा फ्लॅटवरील हक्क कोर्टाने फेटाळला

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनच्या नातेवाईकांनी दाखल केलेली याचिका

Pankaja Munde on Maratha reservation :  “ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची ठाम भूमिका”

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता यश मिळालं आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सातत्यपूर्ण

मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ

Ajit Pawar : कारवाई थांबवा! अवैध कामावर छापा टाकणाऱ्या महिला अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पवारांचा दम, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या थेट आणि धडाडीच्या कामकाजासाठी ओळखले जातात.

...म्हणून मुंबईत कबड्डीपटूने केली आत्महत्या

मुंबई : वांद्रे परिसरात आई आणि भावासोबत राहणाऱ्या २० वर्षीय कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजारी असलेल्या