ऋतुराजचे दीड शतक : महाराष्ट्राचा छत्तीसगडवर विजय

  91

राजकोट (वृत्तसंस्था) : कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या धडाकेबाज नाबाद दीड शतकामुळे महाराष्ट्रने विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय नोंदवला. छत्तीसगडच्या २७६ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रने ८ विकेट आणि १८ चेंडू राखून सहज विजय मिळवला.


ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीचा धडाका कायम असून दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रला सहज विजय मिळवता आला. नाणेफेकीचा कौल जिंकून महाराष्ट्रने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. छत्तीसगडची सुरुवात अडखळत झाली. ६९ धावांवर त्यांचे ४ फलंदाज माघारी परतले होते. अमरदीप खरेच्या ८२ धावा आणि शशांक सिंगच्या ६३ धावांमुळे त्यांचा डाव सावरला. ५० षटकांत छत्तीसगडने ७ फलंदाजांच्या बदल्यात २७५ धावांपर्यंत मजल मारली.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राच्या संघाने धडाकेबाज सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि यश नहर या सलामीवीरांनी १२० धावांची भागीदारी करत महाराष्ट्राला चांगली सुरुवात करून दिली. यश बाद झाल्यानंतर नौशाद शेखने ऋतुराजला बरी साथ दिली. त्यामुळे छत्तीसगडला दुसरी विकेट मिळविण्यासाठी महाराष्ट्राच्या २१६ धावा होईपर्यंत वाट पहावी लागली. ऋतुराज धडाकेबाज फलंदाजी करत १४३ चेंडूंत नाबाद १५४ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रने ४७ षटकांत २७६ धावांचे लक्ष्य गाठले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार