ऋतुराजचे दीड शतक : महाराष्ट्राचा छत्तीसगडवर विजय

  95

राजकोट (वृत्तसंस्था) : कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या धडाकेबाज नाबाद दीड शतकामुळे महाराष्ट्रने विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय नोंदवला. छत्तीसगडच्या २७६ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रने ८ विकेट आणि १८ चेंडू राखून सहज विजय मिळवला.


ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीचा धडाका कायम असून दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रला सहज विजय मिळवता आला. नाणेफेकीचा कौल जिंकून महाराष्ट्रने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. छत्तीसगडची सुरुवात अडखळत झाली. ६९ धावांवर त्यांचे ४ फलंदाज माघारी परतले होते. अमरदीप खरेच्या ८२ धावा आणि शशांक सिंगच्या ६३ धावांमुळे त्यांचा डाव सावरला. ५० षटकांत छत्तीसगडने ७ फलंदाजांच्या बदल्यात २७५ धावांपर्यंत मजल मारली.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राच्या संघाने धडाकेबाज सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि यश नहर या सलामीवीरांनी १२० धावांची भागीदारी करत महाराष्ट्राला चांगली सुरुवात करून दिली. यश बाद झाल्यानंतर नौशाद शेखने ऋतुराजला बरी साथ दिली. त्यामुळे छत्तीसगडला दुसरी विकेट मिळविण्यासाठी महाराष्ट्राच्या २१६ धावा होईपर्यंत वाट पहावी लागली. ऋतुराज धडाकेबाज फलंदाजी करत १४३ चेंडूंत नाबाद १५४ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रने ४७ षटकांत २७६ धावांचे लक्ष्य गाठले.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल