ऋतुराजचे दीड शतक : महाराष्ट्राचा छत्तीसगडवर विजय

राजकोट (वृत्तसंस्था) : कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या धडाकेबाज नाबाद दीड शतकामुळे महाराष्ट्रने विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय नोंदवला. छत्तीसगडच्या २७६ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रने ८ विकेट आणि १८ चेंडू राखून सहज विजय मिळवला.


ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीचा धडाका कायम असून दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रला सहज विजय मिळवता आला. नाणेफेकीचा कौल जिंकून महाराष्ट्रने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. छत्तीसगडची सुरुवात अडखळत झाली. ६९ धावांवर त्यांचे ४ फलंदाज माघारी परतले होते. अमरदीप खरेच्या ८२ धावा आणि शशांक सिंगच्या ६३ धावांमुळे त्यांचा डाव सावरला. ५० षटकांत छत्तीसगडने ७ फलंदाजांच्या बदल्यात २७५ धावांपर्यंत मजल मारली.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राच्या संघाने धडाकेबाज सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि यश नहर या सलामीवीरांनी १२० धावांची भागीदारी करत महाराष्ट्राला चांगली सुरुवात करून दिली. यश बाद झाल्यानंतर नौशाद शेखने ऋतुराजला बरी साथ दिली. त्यामुळे छत्तीसगडला दुसरी विकेट मिळविण्यासाठी महाराष्ट्राच्या २१६ धावा होईपर्यंत वाट पहावी लागली. ऋतुराज धडाकेबाज फलंदाजी करत १४३ चेंडूंत नाबाद १५४ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रने ४७ षटकांत २७६ धावांचे लक्ष्य गाठले.

Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई