परदेशातून आलेले चार जण बेपत्ता झाल्याने औरंगाबादकरांचे टेन्शन वाढले!

औरंगाबाद : ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग सुरू झाल्यानंतर औरंगाबाद शहरात एक डिसेंबरपासून ११४ नागरिक विदेशातून आले. त्यांच्यापैकी एकशे दहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर चार जणांचा संपर्क अद्याप झाला नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. यामुळे औरंगाबादकरांचे टेन्शन वाढले आहे.


दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारने सर्व जिल्हा प्रशासनांना व महापालिका प्रशासनांना सकर्त राहण्याचा इशारा दिला आहे. यानुसार, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. पहिली चाचणी झाल्यानंतर सात दिवसांनी दुसरी चाचणी केली जात आहे. दरम्यानच्या, काळात त्या व्यक्तीला विलगीकरणात राहण्याची सक्ती केली जात आहे.


पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार १ ते ५ डिसेंबर दरम्यान औरंगाबाद शहरात विदेशातून ११४ व्यक्ती आल्या. त्यांच्या पैकी ११० व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली या सर्वांच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चार व्यक्तींचा शोध लागत नाही. त्यांचे फोन नंबर बंद लागतात, पत्ताही सापडत नाही, असे त्यांनी सांगितले.


दरम्यान, महापालिका प्रशासनाने ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची धास्ती घेतली आहे. सध्या औरंगाबाद शहरात या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून मेल्ट्रॉनसह पदमपुरा येथील ‘ईओसी सेंटर’मध्ये ७५ खाटांचे सुसज्ज कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे नवीन व्हेरियंटचा एकदम धोका निर्माण झाला, तर तातडीने किमान चारशे ते साडेचारशे जणांना उपचारांसाठी दाखल करण्याची सोय झाली असल्याची माहिती मिळाली आहे.


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला घाबरून न जाता नागरिकांनी कोरोना संबंधिचे नियम पाळावेत. मास्क घालावा, सतत हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. ज्या नागरिकांनी लस घेतली नाही किंवा लशीचा पहिला डोस घेतला; पण दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी लवकरात लवकर लशीचा डोस घ्यावा, असेही आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा