दोन इंजिनचे सरकार असताना काम दुप्पट वेगाने होते : पंतप्रधान मोदी

Share

गोरखपूर (वृत्तसंस्था) : केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दोन इंजिनांसारखे आहे, त्यामुळे ते दुप्पट वेगाने विकासकामे करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूरमध्ये एका उद्घाटन कार्यक्रमात केले.

शुद्ध हेतूने काम केले जाते, त्यावेळी संकटंही आपल्याला अडवू शकत नाहीत. गोरगरीब, वंचित, शोषितांची काळजी करणार सरकार असते, तेव्हा ते देखील जोमाने काम करतात. त्या सरकारला पुन्हा निवडून आणतात, असे मोदी म्हणाले. मी पाच वर्षांपूर्वी एम्स रुग्णालय आणि खतांच्या कारखान्याच्या पायाभरणी समारंभासाठी आलो होतो. या दोन्ही गोष्टींचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला आज मिळालं. आयसीएमआरच्या रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरला नवी इमारतही आज मिळाली आहे. मी उत्तर प्रदेशच्या नागरिकांचं अभिनंदन करतो, असे मोदींनी पुढे म्हटले.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९,६०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोरखपूरमधल्या विकास प्रकल्पांच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी गोरखपूर फर्टिलायझर प्लांट, एम्स गोरखपूर आणि आयसीएमआर- रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरचं उद्घाटन केले.

Recent Posts

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…

26 minutes ago

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

1 hour ago

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…

2 hours ago

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…

2 hours ago

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…

3 hours ago

अतिरेक्यांशी झुंजताना दोन महिन्यांत सहा जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…

4 hours ago