Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर इशारा दिला आहे.कुत्रा चावल्याच्या होणाऱ्या मृत्यु आणि गंभीर दुखापतीमुळे फक्त सरकारच जबाबदार नसणार,तर भटक्या कुत्र्यानां खाऊ घालनारे ही प्राणीप्रेमी जबाबदार असणार ,असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. गेल्या पाच वर्षांत भटक्या प्राण्यांबाबत असलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे.


७ नोव्हेंबर २०२५ रोजी शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक रस्त्यांवरून भटक्या प्राण्यांना हटवण्याचे दिलेल्या आदेशात बदल करण्याच्या मागणीवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा कडक सूर लावला. न्यायमूर्ती नाथ यांनी स्पष्टपणे सांगितले की, भटक्या कुत्र्यांमुळे एखाद्या मुलाचा किंवा वृद्धाचा मृत्यू झाल्यास राज्य सरकारांना मोठी भरपाई द्यायला भाग पाडले जाईल. श्वानप्रेमींना उद्देशून बोलताना न्यायालयाने संतप्त सवाल केला. “जर रस्त्यावरील कुत्र्यांवर इतके प्रेम आहे, तर त्यांना आपल्या घरात का नेत नाही?” असा थेट प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. रस्त्यावर खाऊ घालून त्यांना तिथेच सोडल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.


न्यायमूर्ती मेहता यांनीही या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करत, “नऊ वर्षांच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केल्यास जबाबदारी कोणाची? खाऊ घालणाऱ्या संस्था की प्रशासन?” असा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करत, यापुढे कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Accident News : लग्नाला निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Accident News : उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ महामार्गावर फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या

Brahmos Missile Deal : ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर भारताची मोठी झेप! व्हिएतनामनंतर इंडोनेशियाही खरेदीसाठी उत्सुक

नवी दिल्ली : भारताच्या अत्याधुनिक आणि जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या

JEE Advanced 2026 Result : शुभम कुमार देशात अव्वल; मुलींमध्ये आरोही देशपांडे ठरली टॉपर!

नवी दिल्ली : जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ (JEE Advanced 2026) परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यंदा आयआयटी दिल्ली

LPG Gas Cylinder Price : LPG ग्राहकांना पुन्हा झटका! गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; आजपासून नवे दर लागू

नवी दिल्ली : देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत (LPG Gas Cylinder Price) पुन्हा एकदा वाढ करण्याची

DRDO Bomb Trial : DRDO च्या ‘हाय-कॅलिबर बॉम्ब’ची ताकद जगासमोर; स्फोटानंतर तुकडे १.५ किमी उंच उडाले, भारतीय हवाई दलाची वाढणार मारक क्षमता

हरियाणा : हरियाणातील पंचकुला येथे असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च

Great Nicobar : होर्मुझ संकटानंतर ग्रेट निकोबार प्रकल्पाला वेग

नवी दिल्ली : इराणमधील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून जागतिक ऊर्जा