Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर इशारा दिला आहे.कुत्रा चावल्याच्या होणाऱ्या मृत्यु आणि गंभीर दुखापतीमुळे फक्त सरकारच जबाबदार नसणार,तर भटक्या कुत्र्यानां खाऊ घालनारे ही प्राणीप्रेमी जबाबदार असणार ,असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. गेल्या पाच वर्षांत भटक्या प्राण्यांबाबत असलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे.


७ नोव्हेंबर २०२५ रोजी शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक रस्त्यांवरून भटक्या प्राण्यांना हटवण्याचे दिलेल्या आदेशात बदल करण्याच्या मागणीवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा कडक सूर लावला. न्यायमूर्ती नाथ यांनी स्पष्टपणे सांगितले की, भटक्या कुत्र्यांमुळे एखाद्या मुलाचा किंवा वृद्धाचा मृत्यू झाल्यास राज्य सरकारांना मोठी भरपाई द्यायला भाग पाडले जाईल. श्वानप्रेमींना उद्देशून बोलताना न्यायालयाने संतप्त सवाल केला. “जर रस्त्यावरील कुत्र्यांवर इतके प्रेम आहे, तर त्यांना आपल्या घरात का नेत नाही?” असा थेट प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. रस्त्यावर खाऊ घालून त्यांना तिथेच सोडल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.


न्यायमूर्ती मेहता यांनीही या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करत, “नऊ वर्षांच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केल्यास जबाबदारी कोणाची? खाऊ घालणाऱ्या संस्था की प्रशासन?” असा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करत, यापुढे कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत