लांजा : लांजा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन २८ दिवस झाले तरी सुरूच असून या कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सहा कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यात इतरत्र बदल्या करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिली.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन सुरु आहे. लांजा एसटी आगारातील कर्मचारी देखील ९ नोव्हेंबरपासून या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे लांजा आगाराचे मोठे नुकसान होत आहे.
२८ दिवसांचा कालावधी उलटला तरी एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. यातील काही कर्मचारी म्हणजे नऊ कर्मचारी हे कामावर हजर झाले आहेत. मात्र इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याने आगाराला दररोज लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. या कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी प्रशासनाकडून यापूर्वी २२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १८ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र तरीही संपकरी कर्मचारी मागे हटण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी ६ डिसेंबर रोजी कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ६ कर्मचाऱ्यांच्या खेड, राजापूर, रत्नागिरी आणि दापोली या ठिकाणी बदल्या करण्यात आलेल्या आहेत,
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…
अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…
मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…
मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…