ढाका (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचा ऑफस्पिनर साजिद खानच्या (३५ धावांमध्ये ६ विकेट) अचूक माऱ्यासमोर बांगलादेशची तारांबळ उडाली आणि दुसऱ्या कसोटीत चौथ्याअखेर यजमानांची ७ बाद ७६ धावा अशी अवस्था झाली आहे. बांगलादेश अद्याप २२४ धावांनी पिछाडीवर आहेत. पाकिस्तानला प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोऑन लादण्यासह मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. पाहुण्यांनी पहिला डाव ४ बाद ३०० धावांवर घोषित केला आहे.
चौथ्या दिवशी मंगळवारी पाऊणतास आधी पाकिस्तानने पहिला डाव घोषित केला. बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली. साजिदने आघाडी फळी मोडून काढल्याने चहापानाला बांगलादेशची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली. तिसरे सत्र खेळून काढले तरी यजमानांनी आणखी ५४ धावांची भर घातली तरी आणखी चार विकेट गमावल्या. बांगलादेशकडून केवळ नजमुल होसेन शांतो (३० धावा) आणि अष्टपैलू शाकीब अल हसनला (खेळत आहे २३) दोन आकडी धावा करता आल्यात. उर्वरित फलंदाजांमध्ये सलामीवीर महमुदुल हसन जॉय आणि मधल्या फळीतील मेहिदी हसन मिराजला खातेही उघडता आलेले नाही. अन्य सलामीवीर शादमन इस्लाम (३), कर्णधार मोमिनुल हक (१), मुशफिकुर रहिम (५) आणि लिटन दासना (६) जेमतेम खाते उघडता आले. ऑफस्पिनर साजिद खानने अप्रतिम मारा करताना १२ षटकांपैकी तीन निर्धाव (मेडन) टाकताना ३५ धावा देत ६ विकेट टिपल्या. कर्णधार मोमिनुल धावचीत झाला.
दुसऱ्या कसोटीला पावसाचा फटका पडला आहे. तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. चौथ्या दिवशीही अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. पहिल्या चार दिवसांत दोन्ही संघांचा एकही डाव न झाल्याने हा सामना अनिर्णितावस्थेकडे झुकला आहे.
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…