तुमच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त; आदित्य ठाकरे राजीनामा द्या

  58

मुंबई  : वरळी बीडीडी चाळ सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.



वरळी बीडीडी चाळीतील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात एकाच कुंटुबातील चार जण जखमी झाले होते. सोमवारपर्यंत त्यातील तिघांचा मुत्यू झाला आहे. आधी चार महिन्यांच्या लहान मुलाचा, त्यानंतर त्याच्या वडिलांचा आणि सोमवारी त्याच्या आईचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. स्फोटानंतर जखमींना मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे अनेकांनी या प्रकरणी टीका केली होती.



दरम्यान ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे. स्थानिक आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.




वाचलेल्या बाळाचे शिवसेनेने स्विकारले पालकत्व



बीडीडी चाळीत सिलेंडर स्फोट होऊन एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या कुटूंबातील ५ वर्षांचा एकटा मुलगा वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलाची जबाबदारी मी स्वत: आणि शिवसेनेने घेतली आहे. यापुढे मी आणि शिवसेना या बाळाचे पालक असू, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील