मुंबई (प्रतिनिधी) : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरणात राहायचे आहे. तसेच दिवसातून पाच वेळा फोन वरुन संपर्क करायचा आहे. तर पालिकेचे पथक प्रत्यक्ष घरी भेट देऊन खात्रीही करणार आहे. यासाठी पालिका सॉफ्टवेअरही तयार करणार आहे.
दरम्यान गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यावर फौजदारी व न्यायालयीन कारवाई देखील केली जाणार आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबत शनिवारी एसओपी जाहीर केली असून विमानतळापासून आरोग्य सेविकांपर्यंत जबाबदारी दिली आहे. गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…