तीन-तीन प्रवासी रिक्षात बसवून प्रवाशांची लूट

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत व्यवसाय करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांविरोधात रिक्षा प्रवाशी आवाज उठवत असून या बाबतची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. कोरोना काळात दबलेल्या आवाजातील हेच रिक्षाचालक आता रिक्षा प्रवाशांची लूट करत आहेत.



शेअर भाडेतत्त्वावर आता तीन-तीन प्रवासी रिक्षात बसवून त्यांच्याकडून दुपटीने भाडे घेत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाचे नियम धाब्यावर बसवून त्यांचा रिक्षा व्यवसाय सुरू आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक नियंत्रण पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे, अशी विचारणा प्रवासी नागरिक करीत आहेत.



सततच्या रिक्षा प्रवासात येणाऱ्या वाईट अनुभवामुळे रिक्षा प्रवाशी त्यांच्या समस्या आता सोशल मीडियावर कथन करू लागले आहेत.
याबाबत काही रिक्षा चालकांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.


तर नाव न छापण्याच्या बोलीवर एक प्रवासी म्हणाले, डोंबिवलीत वाहतूक नियम नाही, रिक्षाचे नियम नाही, नियम अटी कोणी पाळीत नाही त्यामुळे हा विषय वाहतूक नियंत्रण पोलिसांपर्यंत जात नाही.



याबाबत लाल बावटा युनियनचे अध्यक्ष काळू कोमस्कर यांनी सांगितले की, प्रवाशांची लूटमार होत आहे ते काही प्रमाणात खरे आहे. याला सर्वस्वी जबाबदार आरटीओ आणि वाहतूक शाखा आहे. मुख्य स्थानकांवर जास्तीचे पैसे घेतले जात नसले तरी काही ठिकाणी प्रवाशांची फसवणूक होत आहे. रिक्षा दरपत्रकाबाबत सर्व्हे सहा महिने झाले तरी पूर्ण होत नाही. त्यामध्ये भरपूर दुरुस्त्या आणि त्रुटी आहेत. नुकतीच याविषयी बैठक झाली असून त्यावर भरपूर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या