नाशिक: भाषा एकमेकांना जवळ आणते. मात्र हीच भाषा भिंतसुध्दा निर्माण करते असं मत ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गीतकार,लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं आहे.
नाशिकमध्ये संपन्न होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालामध्ये जावेद अख्तर यांनी आपली परखड मत मांडली. लेखक जनतेचं प्रबोधन करतो. मात्र प्रबोधन करताना त्याला विरोधही सहन करावा लागतो. साहित्यकानं त्याच्या साहित्याशी आणि देशाशी प्रमाणिक राहावं. साहित्यकानं कुठल्याही पक्षाचा प्रवक्त होता कामा नये असंही ते म्हणाले.
आजपासून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली खरी मात्र संमेलनाध्यक्षांविनाच साहित्य संमेलनाला सुरुवात झाल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटिल यांनी खंत व्यक्त केली आहे. संमेलनाध्यक्ष डॉ जयंत नारळीकर अनुपस्थित असल्यामुळे ठाले पाटिल यांनी चालता बोलता संमेलनाध्यक्ष निवडा अशी भावना यावेळी व्यक्त केली.
जयंत नारळीकर यांची प्रकृती ठीक नाही हे समजू शकतो पण जर ते किमान एक तास जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते तर सर्व रसिकांना आनंद झाला असता. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. शेकडो लोक आपल्याला पाहायला आले ही बाब लक्षात ठेऊन ते आले असते तर रसिकांना आनंदच झाला असता. जर भविष्यात अशी परिस्थिती ओढावली तरी दुसरा अध्यक्ष निवडण्यात यावा अशी तरतूद मंडळाच्या घटनेत असावी असे मत कौतिकराव ठाले पाटिल यांनी व्यक्त केलं आहे.
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…
पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…
नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…
श्रीनगर : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन ठार केले. या घटनेनंतर…