अयोध्येत बॉम्बस्फोटाची धमकी!

लखनऊ : अयोध्येत एका अज्ञात व्यक्तीने डायल-११२ वर कॉल करून बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. याआधी गेल्या महिन्यातही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने पत्र पाठवून धमकी दिली होती. यापार्श्वभूमीवर अयोध्येत हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे.


बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अयोध्येचे प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा तसेच रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तसेच अयोध्या स्थानकावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली आहे.


गेल्या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश पोलिसांना गुप्तचर यंत्रणेकडून सूचना मिळाली होती. तसेच दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या नावाने मिळालेल्या धमकीच्या पत्रात लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह ४६ रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणेच्या या अलर्टनंतर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली.


आरपीएफ, जीआरपी आणि पोलिसांव्यतिरिक्त श्वान पथकाने लखनऊ, कानपूरसह अनेक रेल्वे स्थानकांचीही तपासणी केली आणि शोधमोहीमही राबविण्यात आली.


याच दहशतवादी संघटनेने यापूर्वी २०१८ मध्येही अशीच धमकी दिली होती.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे