१ एप्रिलपासून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा सुरू

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार असून, यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.


या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरांत जाऊन घराची मालकी, घराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्पर, मजला इ.) याबद्दल माहिती घेतील. तसेच कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग आणि प्रमुखाची जात (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयीचे प्रश्न विचारले जातील.


घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे, विजेची व्यवस्था, सांडपाणी निचरा, शौचालयाची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी आहे का, याचीही नोंद केली जाणार आहे.


आधुनिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी यावेळी नागरिकांकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचीही माहिती घेतली जाईल. यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. त्यासोबतच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात कोणत्या मुख्य धान्याचा वापर होतो, हे देखील प्रगणक विचारतील.


जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

Comments
Add Comment

India Hydrogen Train : भारताच्या हायड्रोजन रेल्वेची यशोगाथा, तीन हजार लिटर डिझेलऐवजी निव्वळ पाण्याची वाफ

नवी दिल्ली : दिल्लीजवळील जिंद आणि सोनीपत या स्थानकांदरम्यान 17 जुलै 2026 रोजी भारताच्या पहिल्या हायड्रोजन

UNESCO World Heritage : सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या 'जागतिक वारसा समिती'च्या 48 व्या बैठकीत, भारताने 2025-26 या

PoK India : पीओके भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानसोबत फक्त याच मुद्यावर चर्चा - राजनाथ सिंह

कारगिल : भारत पाकिस्तानसोबत केवळ पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) या मुद्द्यावरच चर्चा करेल असे

Kargil Vijay Diwas : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त (Kargil Vijay Diwas) कृतज्ञ राष्ट्र आज वीर जवानांना अभिवादन करत आहे. यावर्षीचा मुख्य

Kargil Vijay Diwas : कारगिल ते ऑपरेशन सिंदूर! २७ वर्षांत भारतीय सैन्याची युद्धनीती कशी बदलली?

नवी दिल्ली : २६ जुलै हा दिवस भारतासाठी अभिमानाचा मानला जातो. याच दिवशी १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात (Kargil War)

Delhi Protest : तब्बल ३६ दिवसांनंतर जंतर-मंतर आंदोलन संपलं; रातोरात धुऊन स्वच्छ करण्यात आलं आंदोलनस्थळ

नवी दिल्ली : तब्बल ३६ दिवस घोषणाबाजी (Sloganeering), आंदोलन (Protest) आणि विद्यार्थ्यांच्या (Students) गर्दीने गजबजलेलं जंतर-मंतर (Jantar