१ एप्रिलपासून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा सुरू

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार असून, यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.


या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरांत जाऊन घराची मालकी, घराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्पर, मजला इ.) याबद्दल माहिती घेतील. तसेच कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग आणि प्रमुखाची जात (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयीचे प्रश्न विचारले जातील.


घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे, विजेची व्यवस्था, सांडपाणी निचरा, शौचालयाची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी आहे का, याचीही नोंद केली जाणार आहे.


आधुनिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी यावेळी नागरिकांकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचीही माहिती घेतली जाईल. यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. त्यासोबतच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात कोणत्या मुख्य धान्याचा वापर होतो, हे देखील प्रगणक विचारतील.


जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

Comments
Add Comment

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.

Andaman Natural Gas : अंदमान समुद्रात भारताला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; ऊर्जा क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरणार

नवी दिल्ली : भारताच्या समुद्री ऊर्जा (Offshore Energy) संशोधनात एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. ऑईल इंडिया लिमिटेड (OIL) ने

Manipur : मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, महिलेसह तिघांची हत्या

कांगपोकपी : मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील सैतु-गाम्फाजोल उपमंडळातील लोइबोल खुल्लेन गावात शुक्रवार ५ जून

Monsoon 2026 : आनंदाची बातमी, मान्सून गोव्यात पोहोचला

लवकरच महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकणार पणजी : मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला असून सध्या