ठाणे (वार्ताहर) : ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मामलेदार कचेरीत असणाऱ्या ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आल्यानंतर मामलेदार कचेरीचा दरवाजा लावून घेण्यात आला. परमबीर सिंग यांच्याशिवाय कोणालाही आत सोडण्यात आले नाही.
गेले ७ महिने परमबीर सिंग गायब होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परमबीर सिंग हजर झाले असून गुरुवारी त्यांनी मुंबईतील चौकशीला हजेरी लावली, तर शुक्रवारी ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले.
या चौकशीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजेरी लावली. परमबीर सिंग न्यायालयात आले असताना न्यायालयाचे दरवाजे लावून घेण्यात आले आणि माध्यमातील मंडळींना बाहेरच रोखून धरण्यात आले. न्यायालयामध्ये इतर कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, विकास दाभाडे अशा २८ जणांनी सोनू जालान आणि केतन तन्ना यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून करोडो रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
या प्रकरणातील २८ आरोपींपैकी इतर सर्वांची चौकशी झाली असून परमबीर सिंग चौकशीला हजर राहत नव्हते. परमबीर सिंग गायब असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही काढण्यात आली होती.
मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी अदखलपात्र वॉरंट रद्द केला असून १० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर परमबीर सिंग यांना जामीन मंजूर केला आहे.
त्यांना १५ हजारांचा जामीन द्यावा लागणार आहे. याची पूर्तता ३ डिसेंबरपूर्वी करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा जामीन मंजूर करत असल्याचेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…
मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…