मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार!


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास




जयपूर (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार आहे, असे मोठे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल, असेही राणे यावेळी म्हणाले. राणे यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणी केली. दरम्यान त्यांनी यावेळी एखादे सरकार पाडायचे असेल आणि नवे सरकार स्थापन करायचे असेल, तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असेही मत व्यक्त केले.


महाराष्ट्र सरकार भेदभाव करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे तिथे तसे होते. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल आणि अपेक्षित बदल दिसेल, असेही राणे यांनी सांगितले. दरम्यान दिल्लीत बी. एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली.

Comments
Add Comment

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतात; दरेगावात स्वतःच्या हाताने लावली ३००० स्ट्रॉबेरी रोपे अन् म्हणाले, 'माझे पाय'...

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यादरम्यान राजकीय

‘टेस्ला मोमेंट’ चाकणमध्ये सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

पुण्यात बॅटरीची अदलाबदल करता येणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकचे अनावरण पुणे : बॅटरीची अदलाबदल करता येणाऱ्या

रास्तभाव धान्य दुकानातून धान्य उचला

२० तारखेपर्यंत घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन अलिबाग : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत

जिल्ह्यातील आशा सेविकांचे ४ महिन्यांपासून रखडले मानधन

अलिबाग : शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस काम

राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव

“कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास” - एकनाथ शिंदे

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच, ही काळ्या दगडावरची