मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार!


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास




जयपूर (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार आहे, असे मोठे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल, असेही राणे यावेळी म्हणाले. राणे यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणी केली. दरम्यान त्यांनी यावेळी एखादे सरकार पाडायचे असेल आणि नवे सरकार स्थापन करायचे असेल, तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असेही मत व्यक्त केले.


महाराष्ट्र सरकार भेदभाव करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे तिथे तसे होते. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल आणि अपेक्षित बदल दिसेल, असेही राणे यांनी सांगितले. दरम्यान दिल्लीत बी. एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली.

Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच