मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार!

  71


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास




जयपूर (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार आहे, असे मोठे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल, असेही राणे यावेळी म्हणाले. राणे यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणी केली. दरम्यान त्यांनी यावेळी एखादे सरकार पाडायचे असेल आणि नवे सरकार स्थापन करायचे असेल, तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असेही मत व्यक्त केले.


महाराष्ट्र सरकार भेदभाव करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे तिथे तसे होते. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल आणि अपेक्षित बदल दिसेल, असेही राणे यांनी सांगितले. दरम्यान दिल्लीत बी. एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली.

Comments
Add Comment

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी