मुंबई – मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांमागे चौकशांचे शुक्लकाष्ट लागलं आहे. त्यात आता नवीन नाव सामील झालं असून शुक्रवारी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचे छापे पडले होते. आता त्यांच्यावर आणखी एक नवीन आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी आधीच मनी लॉन्ड्रींग आणि जालना साखर कारखान्याच्या खरेदीवरून अर्जुन खोतकर आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर आरोप केले आहेत. आता त्यांनी नवीन आरोप केला असून खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्श आणि इमारतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कृपेने १०० एकर शासकीय जागा हडपली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन खोतकर यांच्यावर आरोप केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, खोतकर यांना कारखान्याच्या जागेत मॉल तयार करायचा आहे. सरकारने जी जागा दिली होती ती साखर कारखान्यासाठी दिली होती. कारखान्याची एकूण २४० एकर जागा असून त्याची किंमत 1 हजार कोटी आहे. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
नवी दिल्ली: तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा बऱ्याचदा एटीएममधून ५००च्याच नोटा येतात. मात्र…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात १४…
कामांसाठी नेमलेल्या कंपन्यांची होणार चौकशी मुंबई (प्रतिनिधी): मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये अनियमिता दिसून आल्याने…
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…