कानपूर (वृत्तसंस्था): भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कानपूरमधील ग्रीनपार्क स्टेडियमवर होणाऱ्या या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल न्यूझीलंडच्या संघाच्या प्रशिक्षकांनी आपल्या संघाच्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी हे संकेत दिले आहेत की, त्यांचा संघ पहिल्या सामन्यात तीन फिरकीपटू मैदानात उतरवेल.
गॅरी स्टीड यांनी सांगितले की, भारतात येऊन कोणत्याही संघाला जिंकणे अवघड असते. पण इथे चार वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू यांना खेळवणे अवघड आहे. भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी पूरक आहेत. म्हणूनच विदेशी संघांना इथे जिंकणे आव्हानात्मक असते. मात्र जर न्यूझीलंड तीन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरला, तर मैदानाच्या परिस्थितीचा फायदा संघाला होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारपासून मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. या दोन संघांमध्ये दोन कसोटी सामने होणार आहेत. भारताने कीवींना क्लीन स्वीप देत टी-ट्वेन्टी मालिका खिशात घातली आहे.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…