न्यूझीलंडचा संघ तीन फिरकीपटूंसोबत उतरेल

कानपूर (वृत्तसंस्था): भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कानपूरमधील ग्रीनपार्क स्टेडियमवर होणाऱ्या या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल न्यूझीलंडच्या संघाच्या प्रशिक्षकांनी आपल्या संघाच्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी हे संकेत दिले आहेत की, त्यांचा संघ पहिल्या सामन्यात तीन फिरकीपटू मैदानात उतरवेल.


गॅरी स्टीड यांनी सांगितले की, भारतात येऊन कोणत्याही संघाला जिंकणे अवघड असते. पण इथे चार वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू यांना खेळवणे अवघड आहे. भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी पूरक आहेत. म्हणूनच विदेशी संघांना इथे जिंकणे आव्हानात्मक असते. मात्र जर न्यूझीलंड तीन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरला, तर मैदानाच्या परिस्थितीचा फायदा संघाला होईल.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारपासून मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. या दोन संघांमध्ये दोन कसोटी सामने होणार आहेत. भारताने कीवींना क्लीन स्वीप देत टी-ट्वेन्टी मालिका खिशात घातली आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत