न्यूझीलंडचा संघ तीन फिरकीपटूंसोबत उतरेल

कानपूर (वृत्तसंस्था): भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कानपूरमधील ग्रीनपार्क स्टेडियमवर होणाऱ्या या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल न्यूझीलंडच्या संघाच्या प्रशिक्षकांनी आपल्या संघाच्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी हे संकेत दिले आहेत की, त्यांचा संघ पहिल्या सामन्यात तीन फिरकीपटू मैदानात उतरवेल.


गॅरी स्टीड यांनी सांगितले की, भारतात येऊन कोणत्याही संघाला जिंकणे अवघड असते. पण इथे चार वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू यांना खेळवणे अवघड आहे. भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी पूरक आहेत. म्हणूनच विदेशी संघांना इथे जिंकणे आव्हानात्मक असते. मात्र जर न्यूझीलंड तीन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरला, तर मैदानाच्या परिस्थितीचा फायदा संघाला होईल.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारपासून मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. या दोन संघांमध्ये दोन कसोटी सामने होणार आहेत. भारताने कीवींना क्लीन स्वीप देत टी-ट्वेन्टी मालिका खिशात घातली आहे.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या