सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, शशिकांत शिंदे पराभूत

Share

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचे धक्कादायक निकाल हाती आले असून यामध्ये दिग्गजांसह महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा पराभव झाला असून सत्यजित पाटणकर हे विजयी झाले आहेत. जावली तालुक्यातून राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाला आहे, तर ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले आहेत. रांजणे हे राष्ट्रवादी पक्षातील बंडखोर उमेदवार आहेत. त्यांचा विजय झाल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडल्याने साताऱ्यात खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एका मताने पराभव झाल्यानंतर शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आमदार शिंदे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील ज्ञानदेव रांजणे हे एका मताने विजयी झाले आहेत. या निकालाच्या निमित्ताने साताऱ्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याची चित्रं स्पष्ट दिसत आहेत. त्यातच अजित पवारांचा सातारा दौरा सुद्धा रद्द झाला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंचा पराभव हा दौरा रद्द व्हायला कारण तर नाही ना, अशी चर्चाही साताऱ्यात रंगली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे विजयी झाल्यानंतर त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यासारखा बलाढ्य नेता एवढा छोटा पराभव सुद्धा पचवू शकला नाही, असे ते म्हणाले. शशिकांत शिंदेंना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देखील रांजणे यांनी दिला आहे.

कोरेगाव तालुक्यातून सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना समान मत पडल्यामुळे या ठिकाणी टाय झाल्याचे पाहायला मिळाले, तर कराडमधून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला आहे. खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गेही विजयी झाले असून नंदकुमार मोरे यांचा पराभव झाला आहे.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…

16 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

1 hour ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

1 hour ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

2 hours ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

2 hours ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

2 hours ago