सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या कालावधीत जे सूक्ष्म व लघू मध्यम उद्योग बंद पडले त्यांचा अभ्यास करण्यासाठी एक एजन्सी नेमली आहे. त्या एजन्सीचा अहवाल लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी माझ्या एमएसएमई खात्याचे सर्व अधिकारी व कॉयरचे चेअरमन लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून स्थानिक लोकांना उद्योगधंद्याविषयी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी कणकवलीतील प्रहार इमारतीच्या तळमजल्यावर तात्पुरते कार्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, पुखराज पुरोहित, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, जिल्हा चिटणीस महेश सारंग आदी उपस्थित होते.
दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिसेंबरमध्ये साजरा केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एक मोठा क्रीडा महोत्सव होणार आहे. स्थानिक बेरोजगार व पत्रकारांसाठी लवकरच केरळचा विशेष प्रशिक्षण दौराही आयोजित करण्यात येणार असून कॉयर व अन्य व्यवसायांचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राज्याला विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे नेणारे विद्यमान सरकार पडावे, असे मलाही वाटते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसे म्हणाले असतील, तर ते निश्चितच अभ्यास करूनच बोलले असतील. तसे झाले तर तोंडात साखर पडो, असा टोलाही त्यांनी लगावला.
आम्हाला कोणी धक्के देऊ शकत नाही. गेली अनेक वर्षे मी राजकारणात आहे. आम्ही इतरांना धक्के देतो. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही आमदार व खासदारही भाजपचाच असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडी विधानसभेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडे अनेक उमेदवार आहेत. मात्र सध्या कोणाच्याही नावाची घोषणा केली जाणार नाही. आयत्या वेळीच ते नाव जाहीर करू, मात्र भाजपचा उमेदवार मतदारसंघातील स्थानिकच असे स्पष्ट करतानाच मागील निवडणूक लढविलेला उमेदवारही स्थानिकांमध्येच येतो, असा चिमटाही त्यांनी राजन तेली यांचे नाव न घेता काढला.
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…