पालकांच्या मनात कोरोनाची धास्ती कायम

Share

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ४ ऑक्टोबरपासून ८ वी ते १०वीच्या शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही शाळा सुरू केल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत पालिकेने केले. मात्र आता ८ वी ते १० वीच्या पालिका शाळांतील ३४ टक्के विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांनी नकार दिला आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये ८वी ते १०वीच्या शाळांत ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र पालकांच्या मनात कोरोनाची भीती अजूनही असल्यामुळे ७१ हजार विद्यार्थ्यांपैकी २४ हजार २८९ विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांनी नकार दिला आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने मुंबईतील ८ ते १०वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, मुंबईत ४ ऑक्टोबरपासून ८वी ते १०वीच्या शाळा सुरू झाल्या. पालिका शाळांत ८ ते १०वीचे ७१ हजार ९२३ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याआधी पालकांनी संमतीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले. मात्र यापैकी २४ हजार २८९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र न देता मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांच्या मनात अजूनही कोरोनाची धास्ती कायम असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Recent Posts

‘हवा प्रदूषणात’ भारताची स्थिती चिंताजनक

प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…

21 minutes ago

मजबूत औद्योगिक धोरण हवे

उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…

24 minutes ago

सोने आकाशात, डाळी जमिनीवर…

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…

32 minutes ago

शेअर मार्केटमधील शेअर खरेदी-विक्री अर्थात ट्रेडिंगचे प्रकार

डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…

36 minutes ago

जल पर्यटनाची नवी दिशा…

- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…

44 minutes ago

आमची बेस्ट सक्षम व्हावी…

- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…

48 minutes ago