रुग्णांची संख्या हजारांखाली; कोरोना मृत्यूही घटले

Share

मुंबई (प्रतिनिधी) : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात राज्यात ९०६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ही संख्या ९६३ इतकी होती. मंगळवारी दिवसभरात ९१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. गुरुवारी हीच संख्या ९७२ इतकी होती. शुक्रवारी १५ रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारी २४ जणांनी प्राण गमावला.

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून मृत्यूसंख्या कमी झाली आहे. निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. काल राज्यात झालेल्या १५ रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ७२ हजार ६८१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६५ टक्के इतके आहे.

मुंबई मनपा क्षेत्रात सर्वाधिक रुग्णवाढ

राज्यातील कालची एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ११,७०४ इतकी आहे. गुरुवारी ही संख्या ११,७३२ इतकी होती. याबरोबरच राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा विचार करता काल सर्वात जास्त रुग्णवाढ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. मुंबईत एकूण २३१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे, तर त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्यात ८५ नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात ७६ नवे रुग्ण आढळले असून पुणे मनपा क्षेत्रात ७६ रुग्ण आढळले आहेत.

त्या खालोखाल ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण २८, तर ठाणे जिल्ह्यात १६ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३०, कल्याण, डोंबिवली मनपा क्षेत्रात २३, मीरा, भाईंदर मनपा क्षेत्रात १५, पनवेल मनपा क्षेत्रात १६, वसई, विरार मनपा क्षेत्रात २४ आणि रायगडमध्ये ही संख्या १० इतकी आहे.

तसेच, नाशिक मनपा क्षेत्रात २६, नाशिक जिल्ह्यात ३०, सोलापूर जिल्ह्यात १९, साताऱ्यात ही संख्या २२, कोल्हापूर जिल्ह्यात १, कोल्हापूर मनपात ४, सांगलीत ९, रत्नागिरीत ७, तर सिंधुदुर्गात ३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Recent Posts

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

44 minutes ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

1 hour ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

3 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago