उड्डाणपुलाला शिवरायांचे नाव द्या

  61

मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपर मानखुर्द लिंक रोड रस्त्यावरील नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर न झाल्यास भाजप सभागृह चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिला आहे.


घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी भाजप आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनेनेकडून अद्यापही प्रस्ताव प्रलंबित आहे. गेले अनेक महिने भाजपकडून याबाबत सतत पाठपुरावा केला जात आहे. याबाबत महापौरांना पत्रव्यवहारही केला गेला होता. मात्र अद्यापही सत्ताधाऱ्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.


दरम्यान, ३० जुलै २०२१च्या कार्यक्रम पत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामकरणाचा प्रस्ताव असून गेले ४ महिने हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले असून वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात आला आहे. असे असतानादेखील नामकरणाच्या प्रस्तावावर दिरंगाई होताना पहायला मिळाली. त्या प्रस्तावानंतर इतर प्रस्ताव मंजूर झाले, मात्र नामकरणाचा प्रस्ताव मंजूर न झाल्याने भाजप आक्रमक झाली आहे.


२० महिन्यांनंतर प्रत्यक्ष सभा


दरम्यान सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी कोरोनानंतर पहिली प्रत्यक्ष सभा होणार आहे. ही सभा तब्बल २० महिन्यांनंतर होणार आहे. कोरोनामुळे ऑनलाइन सभा सुरू होत्या, मात्र आता प्रत्यक्ष होणाऱ्या सभेत उड्डाणपुलाचा प्रस्तावदेखील येणार आहे. प्रशासनाने नामकरणाच्या प्रस्तावावर पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नामकरणाचा प्रस्ताव योग्य नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. तेच स्पष्टीकरण पुन्हा देण्यात आल्याने वाद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत