उड्डाणपुलाला शिवरायांचे नाव द्या

Share

मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपर मानखुर्द लिंक रोड रस्त्यावरील नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर न झाल्यास भाजप सभागृह चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिला आहे.

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी भाजप आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनेनेकडून अद्यापही प्रस्ताव प्रलंबित आहे. गेले अनेक महिने भाजपकडून याबाबत सतत पाठपुरावा केला जात आहे. याबाबत महापौरांना पत्रव्यवहारही केला गेला होता. मात्र अद्यापही सत्ताधाऱ्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.

दरम्यान, ३० जुलै २०२१च्या कार्यक्रम पत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामकरणाचा प्रस्ताव असून गेले ४ महिने हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले असून वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात आला आहे. असे असतानादेखील नामकरणाच्या प्रस्तावावर दिरंगाई होताना पहायला मिळाली. त्या प्रस्तावानंतर इतर प्रस्ताव मंजूर झाले, मात्र नामकरणाचा प्रस्ताव मंजूर न झाल्याने भाजप आक्रमक झाली आहे.

२० महिन्यांनंतर प्रत्यक्ष सभा

दरम्यान सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी कोरोनानंतर पहिली प्रत्यक्ष सभा होणार आहे. ही सभा तब्बल २० महिन्यांनंतर होणार आहे. कोरोनामुळे ऑनलाइन सभा सुरू होत्या, मात्र आता प्रत्यक्ष होणाऱ्या सभेत उड्डाणपुलाचा प्रस्तावदेखील येणार आहे. प्रशासनाने नामकरणाच्या प्रस्तावावर पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नामकरणाचा प्रस्ताव योग्य नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. तेच स्पष्टीकरण पुन्हा देण्यात आल्याने वाद होण्याची शक्यता आहे.

Recent Posts

घनदाट जंगलात ४८ तासांपासून सुरू आहे गोळीबार, सुरक्षा पथकाने अखेर घेरलंच

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…

2 minutes ago

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…

18 minutes ago

Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…

43 minutes ago

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…

46 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यास भारताची पूर्वतयारी!

नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…

1 hour ago

“कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…

1 hour ago