एसटीचे खासगीकरण करण्याची अनिल परबांची धमकी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या एसटी कामगारांचा संप सुरु आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील लालपरी थांबलेली आहे. एसटी कर्मचारी आणि सरकार यावर काय तोडगा काढतंय, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. असं असलं तरी अद्याप यावर काहीही तोडगा निघालेला नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाचे खासगीकरण करणार असून त्याबाबत पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचे बोलून दाखवले.


परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हा देखील एक पर्याय आहे. मात्र, या खासगीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही. इतर राज्यांमधल्या परिवहन मंडळांचा अभ्यास करुन आपण आपल्या राज्याबाबत निर्णय घेऊ. याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.


एसटी खासगीकरणाचा विचार आम्ही केलेला नाही. मात्र, वेगवेगळे जे पर्याय असतात त्यामधील एक पर्याय तो देखील असतो. मात्र, याबाबत सध्या विचार केला नाहीये. कामगार त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत. सरकार म्हणून लोकांची जबाबदारी जशी आमची आहे तशीच कामगारांचीही आमची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची