मुंबई : महाराष्ट्रात सध्या एसटी कामगारांचा संप सुरु आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील लालपरी थांबलेली आहे. एसटी कर्मचारी आणि सरकार यावर काय तोडगा काढतंय, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. असं असलं तरी अद्याप यावर काहीही तोडगा निघालेला नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाचे खासगीकरण करणार असून त्याबाबत पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचे बोलून दाखवले.
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हा देखील एक पर्याय आहे. मात्र, या खासगीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही. इतर राज्यांमधल्या परिवहन मंडळांचा अभ्यास करुन आपण आपल्या राज्याबाबत निर्णय घेऊ. याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
एसटी खासगीकरणाचा विचार आम्ही केलेला नाही. मात्र, वेगवेगळे जे पर्याय असतात त्यामधील एक पर्याय तो देखील असतो. मात्र, याबाबत सध्या विचार केला नाहीये. कामगार त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत. सरकार म्हणून लोकांची जबाबदारी जशी आमची आहे तशीच कामगारांचीही आमची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे, असे ते म्हणाले.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…