भिवंडी बस आगारात राज्य सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन

Share

मोनिश गायकवाड

भिवंडी : मागील बारा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या एसटी चालक-वाहक यांच्या संपाला बारा दिवस पूर्ण झाल्याने शुक्रवारी भिवंडी एसटी चालक वाहक आंदोलक यांच्या वतीने भिवंडी बस आगार परिसरात राज्य सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यात अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मागील बारा दिवसांपासून आंदोलन राज्यभर सुरू आहे. या आंदोलनात अनेक बस चालक व वाहक यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारच्या परिवहन मंडळाकडून अनेकांना निलंबनाच्या नोटीस सुद्धा देण्यात आल्या. या निलंबनाच्या नोटीसीला न घाबरता त्यांनी आपला हा लढा सुरू ठेवला आहे. या निषेधार्थ शुक्रवारी भिवंडी बस आगार या ठिकाणी बस आगारातील चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी श्राद्ध घालून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

भिवंडी एसटी चालक वाहक यांनी राज्य सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले व या आंदोलनाला अनेक संघटना पक्ष यांनी पाठिंबा दर्शविला आहे. राज्य सरकारने आमच्या कुटुंबीयांचा विचार करावा. मागील अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारात नोकरी करून आपला संसार हाकत आहोत. सरकारनेही आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया आंदोलक सचिन गोडेवर यांनी प्रहारला दिली आहे.

Recent Posts

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

45 minutes ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

1 hour ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

3 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

3 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago