हिंसाचाराचे आरोप असलेल्या रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा, ५२ अटकेत!

नाशिक : त्रिपुरातील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये हिंसाचार पेटला. यामागची पाळेमुळे खणून काढली जात आहेत. पोलिसांनी मालेगाव दंगलीप्रकरणी रझा अकदमीच्या कार्यालयावर मध्यरात्री छापे टाकले होते. त्यात महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे समजते. हे पुरावे लवकरच न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.


सीसीटीव्हीचे चित्रण पाहून आरोपींचा शोध सुरू आहे. रझा अकादमीचे अनेक कार्यकर्ते फरार आहेत. पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. या प्रकरणी ५२ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


याप्रकरणीच्या मूळ सूत्रधाराचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. त्याला लवकर बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे.


बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात त्रिपुरामध्ये झालेल्या निदर्शनेदरम्यान मशिदी जाळण्यात आल्याच्या अफवेवरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजप रझा अकादमी संस्थेला जबाबदार धरत आहे आणि बंदीची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर (१७ नोव्हेंबर, बुधवार) मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत.


मालेगावातील रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलेमा यांनी बंद पुकारला होता. हजारोंच्या संख्येने रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठा हिंसाचार झाला. दुकाने जाळली. दगडफेक आणि तोडफोडीत लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी केवळ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी भाजपकडून सातत्याने होत होती. पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिक आमदारही प्रश्न उपस्थित करत होते. त्यानंतर आज मध्यरात्री पोलिसांनी रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

पुणे : पिंपरी-चिंचवडजवळच्या किवळे (Kiwale) येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज दुहेरी

गुन्हेगारी स्टाईलने 'रिल्स' बनवणा-याला दिला पोलिसांनी दणका

पुणे : दिवाळीच्या उत्सवात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात. अनेकजण आपल्या व्यवसायाच्या

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले

पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार

'महाभाग, गोंधळलेले लोक'; फडणवीसांनी विरोधकांना सोलून काढले!

शरद पवारांच्या अनुपस्थितीवरही ठेवले बोट; विरोधकांना सुनावले खडेबोल सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ratnagiri News : धर्मस्थळाला काळिमा! रत्नागिरीतील आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अन्य पीडितांची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये (Khed, Ratnagiri) एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे,