माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

  35

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल असलेले व गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे (एसप्लानेड) न्यायाधीश भाजीपाले यांनी हा निर्णय दिला.


परमबीर यांच्याबरोबरच रियाज भाटी आणि विनय सिंह यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे. पोलीस आयुक्त पद भूषवलेल्या एका अधिकाऱ्याला न्यायालयानं फरार घोषित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणात काही पोलिसांचाच सहभाग असल्याचेआढळल्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली केली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटींच्या खंडणीचं टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. गोरेगाव खंडणी प्रकरणात वारंवार समन्स बजावूनही हजर होत नसल्यानं मुंबई पालिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी परमबीर व अन्य तिघांना फरार घोषित करून पुढील कार्यवाही करण्याची विनंती अर्जाद्वारे केली होती. त्यावरील सुनावणीअंती न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी हा निर्णय जाहीर केला.


फरार घोषित करण्यात आल्यामुळं परमबीर सिंगांच्या अडचणी वाढणार आहेत. आता मराठी, हिंदी व इंग्रजी वर्तमानपत्रात न्यायालयाच्या आदेशाची प्रसिद्धी करून ३० दिवसांची मुदत दिली जाईल. तरीही हे तिघे न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मिळण्यासाठी गुन्हे शाखेतर्फे न्यायालयात अर्ज दिला जाईल. त्यानंतर त्यावरील सुनावणीअंती न्यायालयाने अनुमती दिल्यानंतर परमबीर सिंग व अन्य दोन्ही आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर कारवाई गुन्हे शाखेचे अधिकारी करतील.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Assembly Session : एसटीची दुरावस्था ते ड्रग्ज तस्करी; अधिवेशनात आज ‘या’ मुद्द्यांवरून होणार खडाजंगी

विधान परिषदेत गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज गाजणार आहे. एक

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या