झाडांवर जाहिराती लावल्यास केडीएमसी दाखल करणार गुन्हे


कल्याण (वार्ताहर) : झाडांवर लोखंडी खिळे आणि तारेचा वापर करून विद्युत रोषणाई आणि बॅनरबाजी करण्यास हरित लवादाने सक्त मनाई केली आहे तसेच अशा पद्धतीने झाडांना इजा पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने वृक्षसंवर्धनासाठी परिपत्रक काढून कारवाई हाती घेतल्याची माहिती सचिव संजय जाधव यांनी दिली.



महानगरपालिकेने २० ऑक्टोबर २०२१ रोजी परिपत्रक काढले असून शहरात मोठ्या प्रमाणात झाडांना पोस्टर, बॅनर, खिळे आणि झेंडे काढण्याचे काम सुरू झाले आहे. अंघोळीची गोळी या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेच्या खिळेमुक्त झाडे उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रभर झाडांवर ठोकलेले खिळे, बॅनर, पोस्टर, झेंडे काढण्याचे काम अनेक युवक करत आहेत. त्याचबरोबर झाडांना मातीचे आळे असावे आणि झाडांच्या पायथ्याशी सिमेंट काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉक लावण्यात येऊ नये आणि झाडांना गेरू आणि चुना व्यतिरिक्त इतर कोणतेही रंग लावले जाऊ नयेत.


झाडांना लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या नादुरुस्त असल्यास काढण्यात याव्यात. यासाठी संस्था वेळोवेळी महाराष्ट्रभर विविध महानगरपालिकांशी पत्रव्यवहार करत आहे. दिवसेंदिवस होणारी तापमानवाढ रोखायची असल्यास, वृक्षसंवर्धन हाच एकमेव प्रभावी उपाय असल्यामुळे विभागाने तत्काळ कारवाई केल्याने पर्यावरणप्रेमींनी या कृतीचे स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

१५ दिवसांत तोडगा न निघाल्याने जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा

सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी