अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा

Share

मुंबई (प्रतिनिधी) : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून नियोजित विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे पहिल्या सामन्याचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा उपकर्णधारपद भूषवेल.

कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची धुरा सांभाळणार आहे. रोहित शर्मासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि रिषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. केएस भरत राखीव यष्टीरक्षक असेल. आंध्र प्रदेशचा २८ वर्षीय भरत हा आयपीएलमध्ये बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून खेळला आहे. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतील राखीव (स्टँडबाय) पाच क्रिकेटपटूंमध्ये त्याचा समावेश होता.

न्यूझीलंड संघ टी-ट्वेन्टी वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत कसोटी मालिकेपूर्वी तीन टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका होईल. ही मालिका जयपूर, रांची आणि कोलकाता येथे रंगेल. कोरोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक म्हणून रूजू होतील.

भारताचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

Recent Posts

RR vs GT, IPL 2025: गिलची ८५ धावांची तुफानी खेळी, गुजरातचे राजस्थानला २१० धावांचे आव्हान

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

9 minutes ago

पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…

1 hour ago

भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…

1 hour ago

Breaking News : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी नंतर सरकारचा ‘बीबीसीला’ इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…

2 hours ago

Raigad: रायगड जिल्ह्यात वणव्यांमुळे तीन हजार हेक्टर वनक्षेत्राची हानी

मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…

2 hours ago

पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…

2 hours ago