अपुऱ्या धावा आणि पॉवर-प्लेचा योग्य वापर नाही : गावस्कर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फलकावर पुरेशा धावा नसणे आणि पॉवर-प्लेचा योग्य वापर नाही, अशा अनेक कारणांमुळे युएईत झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारताला उपांत्य फेरीत पोहोचता आले नाही, असे मत विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.


पॉवर-प्लेमध्ये दोनच क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर उभे असतात. भारताने मागील काही आयसीसी स्पर्धांमध्ये पॉवर-प्लेचा योग्य वापर केलेला नाही. त्यामुळे चांगली गोलंदाजी असलेल्या संघासमोर धावसंख्या उभारता येत नाही. यात बदल होणं गरजेचे आहे, असे गावस्कर यांनी सांगितले. पराभवानंतर प्लेईंग इलेव्हनमध्ये जास्त बदल करू नये, असं गावसकर यांनी सांगितलं. भारताने आपल्या संघात बदल केले आणि त्यामुळे संघाच नुकसान झाले, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय संघात खूप सारे बदल करणं चुकीचं आहे. दोन सामन्यात फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळेत भारतीय संघ इथे पोहोचला आहे. या विचारांमध्ये बदल झाला पाहिजे, असे गावस्करांनी म्हटले.


आयपीएलमधील सहभागी क्रिकेटपटूंची कामगिरी पाहता यंदा वर्ल्डकप जेतेपदासाठी टीम इंडियाला पसंती मिळाली होती. मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या. तर धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरीचा मार्गही बंद झाला आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत