ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर सहज विजय

दुबई (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने गुरुवारी बांगलादेशवर सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नेट रनरेटमध्ये बरीच सुधारणा करताना ग्रुप १ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अवघ्या ६.१ षटकांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.



प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशचा डाव १५ षटकांत ७३ धावांवर आटोपला. अॅडम झम्पाने १९ धावांत ५ विकेट्स घेत टी-२०तील त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशची ही दुसरी नीचांकी खेळी ठरली. यापूर्वी २०१६मध्ये न्यूझीलंडने त्यांना ७० धावांत गुंडाळले होते. गुरुवारच्या सामन्यात मिचेल स्टार्क (२-२१) व जोश हेझलवूड (२-८) यांनी प्रत्येकी दोन, तर ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. बांगलादेशचा मोहम्मद नईम (१७), शमीम होसैन (१९) व महमुदुल्लाह (१६) यांनाच दुहेरी धावसंख्या करता आली.



इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठा धक्का बसला होता आणि त्यात दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवून सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला नेट रनरेटमध्ये आफ्रिकेला मागे टाकण्यासाठी हा सामना ८ षटकांत जिंकणे गरजेचे होते. सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी तो मिळवला.



अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी त्या दृष्टीनं खेळ केला. फिंचने २० चेंडूंत २ चौकार व ४ खणखणीत षटकार खेचून ४० धावा केल्या. त्याने वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या. वॉर्नर १४ चेंडूंत ३ चौकारांसह १८ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने ६.१ षटकांत २ बाद ७८ धावा करताना ग्रुप १मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हा ऑस्ट्रेलियाचा टी-२०तील षटकांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २००७मध्ये त्यांनी श्रीलंकेवर १०.२ षटकांत विजय मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाचे ६ गुण व १.०३१ नेट रनरेट झाला आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: इंग्लंडने भारताच्या विजयाचा घास हिरावला, वर्ल्डकपमध्ये सलग तिसरा पराभव

इंदोर: इंदोरच्या मैदानावर आज भारतीय महिला संघाला इंग्लंडच्या महिला संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

कसोटी क्रिेकेटमधून निवृत्तीनंतर लंडनमध्येच राहण्याच्या निर्णयावर कोहलीने सोडले मौन

कॅनबेरा : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लंडनमध्येच का राहण्याचा

पर्थमध्ये झाला अनर्थ, भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव; पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी

स्मृती मानधना लवकरच 'इंदूरची सून' होणार! प्रियकर पलाश मुच्छलने भर कार्यक्रमात दिली लग्नाची कबुली

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना लवकरच

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला वन-डे सामना आज पर्थमध्ये रंगणार

कॅनबेरा : - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत आहे. सर्वांचे