मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ११९३ नवे बाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाची बाधा झालेल्या नागरिकांची संख्या आता ६६ लाख १४ हजार १५८ इतकी झाली आहे. यातले फक्त १५ हजार ११९ अॅक्टिव्ह रुग्ण असल्यामुळे साथीचे स्वरुप हळूहळू कमी होत आहे.
नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त नोंदवली गेली आहे.
दिवसभरात एकूण १५१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ६४ लाख ५५ हजार १०० इतका झाला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट देखील ९७.६ टक्क्यांवर गेला आहे.
गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ३९ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १,४०, ३१३ इतका झाला आहे.
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…