नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिग्गज क्रिकेटपटूंची कामगिरी चांगली होत नसेल तर त्यांना वगळून तरुणांना संधी द्या, असा माजी महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआयला दिला आहे.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने उपांत्य फेरीचा मार्गही बिकट झाला आहे. माजी क्रिकेटपटूही टीम इंडियाच्या कामगिरीवर निराश आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआयला मोलाचा सल्ला दिला आहे. दिग्गज खेळाडूंची कामगिरी चांगली नसेल तर तरुणांना संधी द्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आम्ही दुसऱ्या संघांवर अवलंबून राहात असू, तर लाज वाटली पाहीजे. वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर आपल्या ताकदीवर उपांत्य फेरी गाठली पाहिजे. दुसऱ्या संघांवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. टीम व्यवस्थापक आणि निवडकर्त्यांनी दिग्गज खेळाडूंचा भविष्य ठरवलं पाहीजे, असे कपिल देव यांनी सांगितले. बीसीसीआयला हा विचार करणं गरजेचं आहे की, तरुण खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना संधी देण्याची वेळ आली आहे.
पुढची पिढी घडवण्यासाठी आम्हाला काम करणं गरजेचं आहे. आमचे तरुण खेळाडू पराभूत होत असतील तर यात काही चुकीचं नाही. त्यांना अनुभव मिळेल. पण दिग्गज खेळाडू प्रदर्शन करत नसतील तर आपण खूपच खराब क्रिकेट खेळत आहोत. यावर टीका होणारच आहे. मला वाटत बीसीसीआयने यात हस्तक्षेप करावा आणि युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याचा विचार करावा, असेही कपिल देव पुढे म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…
ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…