कोरोनासाठीची आरोग्य यंत्रणा डिसेंबरपर्यंत तैनात

  28

मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या स्थितीत मुंबईतील कोरोना नियंत्रणात असला तरी दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या काही कमी नाही. यामुळे डिसेंबरच्या शेवटपर्यंत तरी पालिकेने खास कोरोनासाठी उभी केलेली आरोग्य यंत्रणा जम्बो सेंटरसह सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेतील उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले. दरम्यान दिवाळी सणाचे दिवस हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे असणार आहेत. सणासाठी बाजारात होणारी गर्दी पाहता कोरोना वाढण्याची भीती अद्यापही पालिकेला आहे.


दरम्यान सणांमध्ये कोरोना वाढू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. दिवाळीनंतर ख्रिसमस आणि वर्षअखेर-नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या जल्लोशाचा कार्यक्रम पाहाता पालिका आपली आरोग्य यंत्रणा सुरू ठेवणार आहे. तसेच सणांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दोन लाटा आल्या. कोरोनामुळे आतापर्यंत १६,२२५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७,३२,८८९ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. असे असले तरी आगामी काळात येणारे सण - उत्सव यामध्ये होणारी गर्दीमुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.



सध्या २० हजार बेडवर फक्त १० टक्के रुग्ण


पालिकेने कोरोना रुग्णांना आवश्यक प्रमाणात बेड उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेल्या जम्बो कोविड सेंटरसह एकूण उपलब्ध २० हजार कोविड बेडवर फक्त १० टक्के रुग्ण आहेत. यामध्ये नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये फक्त ३४, एनएससीआय वरळी - ४२, बीकेसी - १७ आणि मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये फक्त २२ रुग्ण आहेत. तर दहिसर, मालाड, कांजूरमार्ग येथील कोविड सेंटर बंद असून शीव येथील सेंटर सुरू करण्यात आलेले नाही.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर