वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनला आर्थिक फटका

मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील दिवाळी सणामुळे चीनमधील उद्योगपतींचीही दिवाळी साजरी होत असते. पण यंदा मात्र तसे चित्र नाही. दिवाळीपूर्वीच चीनचे दिवाळे निघाले आहे. देशात चायना वस्तूंवर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे चीनचे जवळपास ५० हजार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले दीड वर्ष सर्व सणवारांवर निर्बंध आले होते. आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे आणि लसीकरणही वेगात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यंदा घरगुती स्तरावर ग्राहकांमध्ये वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणावर उलाढाल होईल, असा अंदाज आहे.


देशभरात ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी दिसत आहे, त्यामुळेच व्यापारी वर्गाला एका मोठ्या आर्थिक उलाढालीची अपेक्षा यंदाच्या उत्सावातील खरेदी-विक्रीतून आहे. दिवाळी कालावधीतील खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या वर्षी 2 लाख कोटी रुपयांची भर अर्थव्यवस्थेत पडेल, अशी आशा कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केल आहे. त्याचबरोबर देशात चायना मालावर बहिष्कार करण्याच्या आवाहनामुळे यंदाच्या सण उत्सवाच्या तोंडावर चीनला व्यापारात ५० हजार कोटीचं आर्थिक नुकसान झाले आहे.


गतवर्षीप्रमाणेच यंदाही कॅटने चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून देशातील व्यापारी आणि आयातकर्त्यांनी चीनमधून माल मागवणे बंद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षभरापासून ग्राहकांनीही चायना मालाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, स्वदेशी, भारतीय सामानास बाजारात चांगली मागणी होत आहे.

Comments
Add Comment

राज्यातील ९ लाख ८४ हजार पेक्षा अधिक मुलींना गर्भाशयमुख प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण लस

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य

आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश मुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये

महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला

मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार मुंबई :

‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी