करा किंवा मरा


बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला विजय आवश्यक




शारजा (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील (ग्रुप १) शुक्रवारच्या (२९ ऑक्टोबर) पहिल्या सामन्यात गतविजेता वेस्ट इंडिज आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी उभय संघांना विजय आवश्यक आहे.


वेस्ट इंडिजला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मात खावी लागली. बांगलादेशचा श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. गटवार साखळीतील आव्हान कायम राखण्यासाठी किमान तीन विजय आवश्यक आहेत. त्यामुळे आणखी एक पराभव बांगलादेश किंवा वेस्ट इंडिजला स्पर्धेबाहेर फेकू शकतो. त्यात बांगलादेशच्या तुलनेत विंडिजची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण ते गतविजेते आहेत.


सर्व आघाड्यांवरील खराब कामगिरी हे वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. इंग्लिश गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजची कागदावरील बलवान बॅटिंग पत्त्यांसारखी कोसळली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इविन लेविस आणि कर्णधार कायरॉन पोलार्डने थोडा प्रतिकार केला. मात्र, इंग्लंडविरुद्ध आव्हान कमी असूनही प्रभावी मारा करणाऱ्या गोलंदाजांनी निराशा केली. गतविजेत्यांची गोलंदाजी कमकुवत आहे. त्यामुळे फलंदाजीवर अधिक भिस्त आहे. परंतु, टी-ट्वेन्टीचा बादशहा ख्रिस गेलसह लेंडल सिमन्स, निकोलस पुरन, आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर, ड्व्येन ब्राव्होला अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे फलंदाजी उंचावली, तरच विंडिजला विजयाची थोडी फार आशा बाळगता येईल.


बांगलादेशने श्रीलंकेला चांगलेच झुंजवले. मात्र, हाणामारीच्या षटकांत प्रतिस्पर्धी फलंदाज वरचढ ठरले. इंग्लंडविरुद्ध मात्र फलंदाजी ढेपाळली. मोहम्मद नईमसह मुशफिकुर रहिमने फलंदाजीत थोडा प्रभाव पाडला आहे. मात्र, कर्णधार महमुदुल्ला तसेच अष्टपैलू शाकीब अल् हसनने निराशा केली आहे. गोलंदाजीही तितकी प्रभावी नाही. त्यामुळे सांघिक कामगिरी उंचावली नाही तर बांगलादेशचे काही खरे नाही.


वेळ : दु. ३.३० वा.

Comments
Add Comment

टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक

भारत विरुद्ध न्यूझीलंड ‘वन-डे’ची आजपासून रणधुमाळी

स्टार खेळाडूंचे पुनरागमन; जयस्वाल-पंत कट्ट्यावर? बडोदरा : भारतीय क्रिकेट संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी, रविवार (११

Cricket News: स्थानिक क्रिकेटपटुचा सामानादरम्यान मैदानातच मृत्यु; खेळता खेळता अचानक खाली पडला..

मिझोरममध्ये क्रिकेटसृष्टीत दुर्दैवी घटना घडली आहे. राज्याचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि वेंघनुई रेडर्स सीसीचे

तिलक वर्मा दुखापतग्रस्त

नवी दिल्ली : आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. युवा आणि प्रतिभावान

अॅशेसवर ऑस्ट्रेलियाचेच नांव

इंग्लंडवर ५ गडी राखून विजय; मालिका ४-१ ने खिशात सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या