अपेक्षाभंग!

  31

दुबई (वृत्तसंस्था): कुठल्याही खेळात गत कामगिरीच्या आधारे निकाल ठरवता येत नाही. त्या-त्या दिवशी सरस कामगिरी करणारा संघ जिंकतो. यूएईत सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप क्रिकेटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी भारताच्या चाहत्यांना तसा अनुभव आला. माजी विजेता भारताचा संघ वर्ल्डकपमध्ये प्रथमच पाकिस्तानविरुद्ध हरला, तोही दहा विकेटनी. लाजिरवाण्या पराभवापेक्षा विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी अपेक्षाभंग केल्याचे दु:ख अधिक आहे.


टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारताने यापूर्वी पाच वेळा बाजी मारली होती. मात्र, यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानने जिगरबाज खेळ करून पराभवांची मालिका खंडित केली. १५२ धावांचे आव्हान फार मोठे नसले तरी प्रतिस्पर्ध्यांनी दहा विकेट राखून मिळवलेला विजय जखमेवर मीठ चोळण्यासारखाच आहे. भारताच्या नावाजलेल्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहणे जड झाले. त्याच खेळपट्टीवर मोहम्मद रिझवान (५५ चेंडूंत नाबाद ७८ धावा) आणि कर्णधार बाबर आझमने (५२ चेंडूंत नाबाद ६८ धावा) केलेली फटकेबाजी म्हणजे भारताच्या अनुभवी गोलंदाजांचे मोठे अपयश आहे. त्यामुळे बॅटरप्रमाणे बॉलरही पराभवासाठी तितकेच जबाबदार आहेत. स्विंग टाकण्यात तरबेज असलेल्या मध्यमगती भुवनेश्वरने तीन षटकांत २५ धावा दिल्या. अनुभवी मोहम्मद शमी (४२-०)आणि जसप्रीत बुमरानेही (२२-०) स्वैर गोलंदाजी केली. त्याचा फायदा पाकिस्तानच्या ओपनर्सनी उठवला. नवोदित वरुण चक्रवर्ती (३३-०) आणि रवींद्र जडेजाने (२८-०) निराशा केली.


त्यापूर्वी, भारताला स्टार फलंदाज रोहित शर्मासह लोकेश राहुलकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, दोघांनीही निराशा केली. उपकर्णधार खातेही उघडू शकला नाही. राहुल केवळ तीन धावा करू शकला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने अप्रतिम स्पेल टाकताना पाकिस्तानला सामन्यावर वर्चस्व मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.


ओपनिंग जोडी लवकर बाद झाल्याने मधल्या फळीवर दडपण आले. कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर टिकून राहण्याचे धाडस दाखवले तरी रिषभ पंत वगळता अन्य फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाही. सूर्यकुमार यादवसह अष्टपैलू जोडी हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाला दडपण हाताळण्यात अपयश आले.


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने त्याच्या गोलंदाजांचा वापर योग्य प्रकारे केला. डावखुऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने विश्वास सार्थ ठरवल्यानंतर त्याने इमाद वासिमला थांबवताना दुसरा मध्यमगती गोलंदाज हसन अलीला गोलंदाजीला आणले. त्यानेही विकेट घेतली. शेवटच्या षटकांमध्ये अली थोडा महागडा ठरला तरी शादाब खान आणि हॅरिस रौफने त्यांचा कोटा पूर्ण करतानाच एकेक विकेटही घेतली.

Comments
Add Comment

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन

N C Classic: नीरज चोप्राने एनसी क्लासिक स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक, घरच्या मैदानावर दमदार कामगिरी

बेंगळुरू: शनिवारी बेंगळुरूमधील श्री कांतीरवा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत

IND vs ENG: कर्णधार शुभमन गिलची बॅट पुन्हा एकदा गरजली, आता दुसऱ्या डावातही शतक झळकावले

महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा ५४ वर्षांचा जुना विक्रम मोडला  बर्मिंगहॅम: एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडविरुद्ध

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका होणार की नाही होणार ? अखेर उत्तर मिळाले

मुंबई : भारत आणि बांगलादेश या दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन

पराभवाची चाहूल लागताच संतापला इंग्रज, DRS वरुन पंचांवर भडकला बेन स्टोक्स

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला

IND vs ENG Test 2: तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे २४४ धावांची आघाडी

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. शुक्रवारी