सुपर १२मधील चार संघांत भारताचा समावेश

  45

दुबई (वृत्तसंस्था) : टी २० वर्ल्डकपमध्ये पात्रता फेरीचे सामने सुरू असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवले आहे. सुपर १२ मधील चार संघांना त्यांनी पसंती दिली आहे. ब्रॅड हॉगच्या मते उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे पोहोचतील. हा वर्ल्डकप भारत किंवा पाकिस्तान जिंकेल असंही त्यांनी पुढे सांगितले. तर ऑस्ट्रेलिया संघाला त्यांनी पसंती दिलेली नाही.


माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर चर्चेदरम्यान हॉगने हे भाकीत वर्तविले आहे. माझ्या मते गट १ मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचतील. तर गट २ मधून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचतील, असे ब्रॅड हॉगने म्हटले आहे. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो; मात्र यासाठी त्यांना भारताला पराभूत करावे लागेल, असे त्याने स्पष्ट केले.


भारताविरुद्धचा पहिला सामना गमवल्यास पाकिस्तानकडे न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकत पुनरागमन करण्याची खूप कमी संधी आहे. त्यामुळे थोडे गणित बदलेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवणे कठीण आहे, असे ब्रॅड हॉगचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी