भारत दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो...


पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल वीरेंद्र सेहवागचे वक्तव्य




दुबई (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकातील सर्वात हाय-प्रोफाईल मॅच २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीवर या दोन्ही देशांतील नव्हे तर, संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. वर्ल्डकपच्या काळात पाकिस्तानकडून संघांची स्तुती करणारी मोठमोठी विधाने समोर येत असतात. तर, दुसरीकडे भारतीय संघ फक्त आपल्या रणनितीकडे लक्ष्य केंद्रीत करतो आणि दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो. त्यामुळे निकाल काय येणार आहे हे माहिती असते, असे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटले आहे.


टी -२० विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुमारे २८ महिन्यांनंतर दोन्ही संघ समोरासमोर असतील. दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१९च्या विश्वचषकात मैदानात उतरले होते. आता सुपर -१२मधील उभय संघाचा रविवारी पहिला सामना असेल. भारत आणि पाकिस्तानला गट दोनमध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे.


पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकला नाही आणि यावेळी तो जिंकू शकतो की नाही, याविषयी चर्चाही कायम आहे. मी नेहमी म्हणालो आहे, हा खूप मोठा खेळ आहे. आपण सद्यस्थिती आणि या फॉर्मेटबद्दल बोललो तर मला वाटते की, पाकिस्तानला नेहमीच अधिक संधी असते. कारण ते ५० षटकांच्या दीर्घ फॉर्मेटमध्ये चांगले खेळू शकत नाहीत. या फॉरमॅटमध्ये एकच खेळाडू कोणत्याही संघाला हरवू शकतो. पण तरीही, पाकिस्तान ते करू शकला नाही, २४ तारखेला काय होईल ते आपण पाहच, असे सेहवागने म्हटले आहे.


२००३ विश्वचषक आणि २०११ विश्वचषक याबद्दल बोलायचे झाल्यास आमच्यावर कमी दबाव होता. आमची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली होती. आम्ही कधीच मोठमोठे दावे केले नाहीत. भारतीय संघ फक्त आपल्या रणनितीकडे लक्ष्य केंद्रीत करतो. त्यामुळे निकाल काय येणार आहे हे माहिती असते, असे सेहवाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात