बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप सरसावली

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्यावतीने, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी निदर्शने करण्यात आली. वडाळा आगार येथे भाजप सदस्य आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. भाजप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.


गेली अनेक वर्षे बससेवा तोट्यात आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ही आर्थिक तूट वाढत चालली आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होतो आहे. अपुरा आणि अनियमित पगार आणि कामाचा वाढता ताण अशा अनेकविध समस्यांशी कर्मचाऱ्यांना झगडावे लागत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजीही देण्यात आली.


यावेळी भाजप समिती सदस्य सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे, गणेश खणकर, अरविंद कागिणकर, राजेश हाटले, शिवकुमार झा उपस्थित होते.


बेस्ट अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या "अ"अर्थसंकल्पात विलीनीकरण करा, बेस्ट बस चालक इतर आस्थापनासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घ्या, स्वतःच्या मालकीच्या बस ताफा कायमस्वरूपी राखा, कोविड चार्जशीट रद्द करा, कोविड भत्ता व एल.टी.ए. लवकरात लवकर द्या, बेस्ट कामगारांना सन २०२१ वर्षाचा सानुग्रह अनुदान मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण