बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप सरसावली

  84

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्यावतीने, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी निदर्शने करण्यात आली. वडाळा आगार येथे भाजप सदस्य आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. भाजप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.


गेली अनेक वर्षे बससेवा तोट्यात आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ही आर्थिक तूट वाढत चालली आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होतो आहे. अपुरा आणि अनियमित पगार आणि कामाचा वाढता ताण अशा अनेकविध समस्यांशी कर्मचाऱ्यांना झगडावे लागत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजीही देण्यात आली.


यावेळी भाजप समिती सदस्य सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे, गणेश खणकर, अरविंद कागिणकर, राजेश हाटले, शिवकुमार झा उपस्थित होते.


बेस्ट अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या "अ"अर्थसंकल्पात विलीनीकरण करा, बेस्ट बस चालक इतर आस्थापनासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घ्या, स्वतःच्या मालकीच्या बस ताफा कायमस्वरूपी राखा, कोविड चार्जशीट रद्द करा, कोविड भत्ता व एल.टी.ए. लवकरात लवकर द्या, बेस्ट कामगारांना सन २०२१ वर्षाचा सानुग्रह अनुदान मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही