आर्यन खानला जामीन नाहीच

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी ३ ऑक्टोबरपासून अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला बुधवारीही दिलासा मिळू शकला नाही. विशेष एनडीपीएस कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याच्यासह आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा यांचे जामीन अर्जही कोर्टाने फेटाळले आहेत. त्यामुळे आर्यनला आणखी काही दिवस ‘मन्नत’ ऐवजी कोठडीतच राहावे लागणार आहे.


आर्यन खानसह तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यानी आपला निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय न्यायाधीश पाटील यांनी दिला व तिघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे तिघांचाही कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सध्या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे.


दरम्यान, आर्यनसाठी आजच मुंबई हायकोर्टात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात त्याची वकिलांची टीम असून एनडीपीएस कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळण्याच्या प्रतीक्षेत वकील आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील अन्य १२ आरोपींच्या जामीन अर्जांविषयी एनसीबीने प्रतिज्ञापत्रावर उत्तर आज दाखल केले आहे. त्याला अनुसरून एनसीबीचे वकील अद्वैत सेठना यांनी म्हणणे मांडले. आजच्या तीन अर्जांवरील निर्णयाच्या आदेशाची प्रत आम्हाला मिळावी, कारण त्यावर अन्य आरोपींच्या अर्जांविषयी आमचा बराचसा युक्तिवाद अवलंबून आहे, असे अद्वैत सेठना यांनी नमूद केले.



सत्यमेव जयते...


एनसीबीने बुधवारी कोर्टात आर्यनचे असे काही चॅट सादर केले. त्यात आर्यन व एका नवोदित अभिनेत्रीमध्ये ड्रग्जबाबत चर्चा झाल्याचे पुरावे एनसीबीला मिळाले आहेत. हे पुरावे एनसीबीने न्यायालयात सादर केले आहेत. त्याच आधारावर न्यायालयाने जामीन नाकारल्याचा म्हटले जात आहे. त्यातच समीर वानखेडे यांनी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिल्याचे समजते.



आता मुंबई हायकोर्टात अर्ज


विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकिलांनी लगेचच जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यनने जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला असून या अर्जावर तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी उद्या आर्यनच्या वकिलांकडून विनंती केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.