कचऱ्याबाबत जनजागृतीसाठी डोंबिवलीत पथनाट्य

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न जैसे थे असून, येथील कचऱ्यासंदर्भातील जनजागृतीसाठी सर्व सामाजिक संस्था आणि मंजुनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पथनाट्याचे सादरीकरण केले.


कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेकवेळा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी हा प्रश्न तसाच आहे. डोंबिवली पूर्व येथील पांडुरंग वाडी चौकात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात होता. हा परिसर स्वच्छ राहावा यासाठी विविध संस्थानी पुढाकार घेतला असून या ठिकाणी स्वच्छता मार्शलची नेमणूक केली आहे. यावेळी महापालिका या परिसरात डांबरिकरण करून देईल, असे आश्वासन महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे यांनी यावेळी दिले


अनेक वेळा विविध उपक्रम राबवून देखील महापालिकेच्या उपक्रमांना यश येत नसल्याने डोंबिवलीतील सामाजिक संस्था कचरा प्रश्न सोडवण्यासाठी एकवटल्या आहेत. कचरा घंटा गाडीतच टाकावा, अशा सूचना देतानाच या परिसरात काही सुशोभीकरण व्हावे जेणेकरून नागरिक कचरा फेकणार नाहीत, अशी मागणी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले आणि स्वच्छ डोंबिवली उपक्रमातील अनिल मोकल यांनी ग प्रभागाचे प्रभारी अधिकारी सुहास गुप्ते यांच्याकडे केली.


यावेळी सुहास गुप्ते यांनी पथनाट्य करणारे २० विद्यार्थी असून असे १००० विद्यार्थी तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करून रस्त्यात थुंकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा इतस्ततः फेकू नका असा संदेश दिला. यावेळी प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाई वाले स्वच्छ डोंबिवली अभियानाचे अनिल मोकल, आजूबाजूच्या परिसरात राहणारे रहिवासी उपस्थित होते.


Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र