कचऱ्याबाबत जनजागृतीसाठी डोंबिवलीत पथनाट्य

  326

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न जैसे थे असून, येथील कचऱ्यासंदर्भातील जनजागृतीसाठी सर्व सामाजिक संस्था आणि मंजुनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पथनाट्याचे सादरीकरण केले.


कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेकवेळा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी हा प्रश्न तसाच आहे. डोंबिवली पूर्व येथील पांडुरंग वाडी चौकात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात होता. हा परिसर स्वच्छ राहावा यासाठी विविध संस्थानी पुढाकार घेतला असून या ठिकाणी स्वच्छता मार्शलची नेमणूक केली आहे. यावेळी महापालिका या परिसरात डांबरिकरण करून देईल, असे आश्वासन महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे यांनी यावेळी दिले


अनेक वेळा विविध उपक्रम राबवून देखील महापालिकेच्या उपक्रमांना यश येत नसल्याने डोंबिवलीतील सामाजिक संस्था कचरा प्रश्न सोडवण्यासाठी एकवटल्या आहेत. कचरा घंटा गाडीतच टाकावा, अशा सूचना देतानाच या परिसरात काही सुशोभीकरण व्हावे जेणेकरून नागरिक कचरा फेकणार नाहीत, अशी मागणी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले आणि स्वच्छ डोंबिवली उपक्रमातील अनिल मोकल यांनी ग प्रभागाचे प्रभारी अधिकारी सुहास गुप्ते यांच्याकडे केली.


यावेळी सुहास गुप्ते यांनी पथनाट्य करणारे २० विद्यार्थी असून असे १००० विद्यार्थी तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करून रस्त्यात थुंकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा इतस्ततः फेकू नका असा संदेश दिला. यावेळी प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाई वाले स्वच्छ डोंबिवली अभियानाचे अनिल मोकल, आजूबाजूच्या परिसरात राहणारे रहिवासी उपस्थित होते.


Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही