कचऱ्याबाबत जनजागृतीसाठी डोंबिवलीत पथनाट्य

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न जैसे थे असून, येथील कचऱ्यासंदर्भातील जनजागृतीसाठी सर्व सामाजिक संस्था आणि मंजुनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पथनाट्याचे सादरीकरण केले.


कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेकवेळा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी हा प्रश्न तसाच आहे. डोंबिवली पूर्व येथील पांडुरंग वाडी चौकात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात होता. हा परिसर स्वच्छ राहावा यासाठी विविध संस्थानी पुढाकार घेतला असून या ठिकाणी स्वच्छता मार्शलची नेमणूक केली आहे. यावेळी महापालिका या परिसरात डांबरिकरण करून देईल, असे आश्वासन महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे यांनी यावेळी दिले


अनेक वेळा विविध उपक्रम राबवून देखील महापालिकेच्या उपक्रमांना यश येत नसल्याने डोंबिवलीतील सामाजिक संस्था कचरा प्रश्न सोडवण्यासाठी एकवटल्या आहेत. कचरा घंटा गाडीतच टाकावा, अशा सूचना देतानाच या परिसरात काही सुशोभीकरण व्हावे जेणेकरून नागरिक कचरा फेकणार नाहीत, अशी मागणी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले आणि स्वच्छ डोंबिवली उपक्रमातील अनिल मोकल यांनी ग प्रभागाचे प्रभारी अधिकारी सुहास गुप्ते यांच्याकडे केली.


यावेळी सुहास गुप्ते यांनी पथनाट्य करणारे २० विद्यार्थी असून असे १००० विद्यार्थी तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करून रस्त्यात थुंकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा इतस्ततः फेकू नका असा संदेश दिला. यावेळी प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाई वाले स्वच्छ डोंबिवली अभियानाचे अनिल मोकल, आजूबाजूच्या परिसरात राहणारे रहिवासी उपस्थित होते.


Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन