कचऱ्याबाबत जनजागृतीसाठी डोंबिवलीत पथनाट्य

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न जैसे थे असून, येथील कचऱ्यासंदर्भातील जनजागृतीसाठी सर्व सामाजिक संस्था आणि मंजुनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पथनाट्याचे सादरीकरण केले.


कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेकवेळा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी हा प्रश्न तसाच आहे. डोंबिवली पूर्व येथील पांडुरंग वाडी चौकात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात होता. हा परिसर स्वच्छ राहावा यासाठी विविध संस्थानी पुढाकार घेतला असून या ठिकाणी स्वच्छता मार्शलची नेमणूक केली आहे. यावेळी महापालिका या परिसरात डांबरिकरण करून देईल, असे आश्वासन महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे यांनी यावेळी दिले


अनेक वेळा विविध उपक्रम राबवून देखील महापालिकेच्या उपक्रमांना यश येत नसल्याने डोंबिवलीतील सामाजिक संस्था कचरा प्रश्न सोडवण्यासाठी एकवटल्या आहेत. कचरा घंटा गाडीतच टाकावा, अशा सूचना देतानाच या परिसरात काही सुशोभीकरण व्हावे जेणेकरून नागरिक कचरा फेकणार नाहीत, अशी मागणी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले आणि स्वच्छ डोंबिवली उपक्रमातील अनिल मोकल यांनी ग प्रभागाचे प्रभारी अधिकारी सुहास गुप्ते यांच्याकडे केली.


यावेळी सुहास गुप्ते यांनी पथनाट्य करणारे २० विद्यार्थी असून असे १००० विद्यार्थी तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करून रस्त्यात थुंकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा इतस्ततः फेकू नका असा संदेश दिला. यावेळी प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, महापालिका उपअभियंता रोहिणी लोकरे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाई वाले स्वच्छ डोंबिवली अभियानाचे अनिल मोकल, आजूबाजूच्या परिसरात राहणारे रहिवासी उपस्थित होते.


Comments
Add Comment

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक

प्रभादेवीतील साई सुंदरनगर, कामगारनगरमधील नाल्यांचे बांधकाम होणार

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती मुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर,