नीलेश कासाट
कासा : डहाणू-जव्हार या राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात खड्डे पडत असून मोठ्या रहदारीचा हा मार्ग असल्याने अनेक वाहनचालकांना यामुळे त्रास होत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झालेले आहेत. ह्या बाबतची बातमी ‘दै. प्रहार’ने प्रकाशित केली होती. अखेर दि. १९ ऑक्टोबरपासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार पडलेल्या पावसामुळे कासा ते डहाणू दरम्यान रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले होते तर, अनेक वाहनचालकांची वाहने नादुरुस्त झाली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून नागरिक व वाहनचालक या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत होते. अखेर मंगळवारी या मोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम बांधकाम खात्याने हाती घेतले. डंपर, रोलर व अनेक मजूरांच्या साहाय्याने त्यांनी डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.
डहाणू-नाशिक हा राज्यमार्ग असून मोठी रहदारी या नियमित रस्त्यावर असते. त्यात कासा ते डहाणू रस्त्यावर वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. डहाणू येथे मोठी बाजारपेठ असल्याने अनेक खेडोपाड्यातील नागरिक खरेदीसाठी या रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे या रस्तावर नेहमी वर्दळ असते.
गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या तक्रारी येत होत्या. सध्या मोठे खड्डे भरण्याचे काम सुरू असून लवकरच हा रस्ता पूर्ण डांबरीकरण केला जाणार आहे. यासाठीची निविदा काढली आहे. – धनंजय जाधव, अभियंता, बांधकाम विभाग डहाणू
अनेक दिवसांच्या मागणीने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले. नुसते खड्डे भरून चालणार नाही, तर हा पूर्ण रस्ताच डांबरीकरण केला पाहिजे. – अशोक भोईर, सामाजिक कार्यकर्ते
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…