डहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरुस्ती सुरू

नीलेश कासाट


कासा : डहाणू-जव्हार या राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात खड्डे पडत असून मोठ्या रहदारीचा हा मार्ग असल्याने अनेक वाहनचालकांना यामुळे त्रास होत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झालेले आहेत. ह्या बाबतची बातमी ‘दै. प्रहार’ने प्रकाशित केली होती. अखेर दि. १९ ऑक्टोबरपासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार पडलेल्या पावसामुळे कासा ते डहाणू दरम्यान रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले होते तर, अनेक वाहनचालकांची वाहने नादुरुस्त झाली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून नागरिक व वाहनचालक या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत होते. अखेर मंगळवारी या मोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम बांधकाम खात्याने हाती घेतले. डंपर, रोलर व अनेक मजूरांच्या साहाय्याने त्यांनी डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.


डहाणू-नाशिक हा राज्यमार्ग असून मोठी रहदारी या नियमित रस्त्यावर असते. त्यात कासा ते डहाणू रस्त्यावर वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. डहाणू येथे मोठी बाजारपेठ असल्याने अनेक खेडोपाड्यातील नागरिक खरेदीसाठी या रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे या रस्तावर नेहमी वर्दळ असते.


गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या तक्रारी येत होत्या. सध्या मोठे खड्डे भरण्याचे काम सुरू असून लवकरच हा रस्ता पूर्ण डांबरीकरण केला जाणार आहे. यासाठीची निविदा काढली आहे. - धनंजय जाधव, अभियंता, बांधकाम विभाग डहाणू


अनेक दिवसांच्या मागणीने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले. नुसते खड्डे भरून चालणार नाही, तर हा पूर्ण रस्ताच डांबरीकरण केला पाहिजे. - अशोक भोईर, सामाजिक कार्यकर्ते

Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त