फलंदाजीचा क्रम जुळवण्यास भारत सज्ज

  138

अबुधाबी (वृत्तसंस्था): भारताचा संघ दुसऱ्या सराव सामन्यात बुधवारी (२० ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाशी झुंजेल. या लढतीद्वारे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ फलंदाजीचा क्रम निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.


भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपापल्या सराव लढती जिंकल्या. भारताने इंग्लंडवर सात विकेटनी मात केली. माजी विजेत्यांकडून फलंदाजीत ईशान किशन, लोकेश राहुल आणि रिषभ पंत तसेच गोलंदाजीत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने छाप पाडली. मुख्य स्पर्धेत लोकेशसह उपकर्णधार रोहित शर्मा ओपनरच्या भूमिकेत असतील. तसेच कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरणार असल्याचे भारताच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध राहुलसह डावाची सुरुवात करताना यष्टिरक्षक, फलंदाज ईशानने मोठी खेळी उभारली. त्यामुळे त्याचे अंतिम संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे. सूर्यकुमार यादवच्या आधी संधी मिळालेला नियोजित विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने बॅटिंगमध्ये चमक दाखवली.


इंग्लंडविरुद्ध न खेळलेला रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याने फटकेबाजी केली तरी तो कम्फर्टेबल वाटला नाही. त्याच्याकडून गोलंदाजीही करवून घेतली गेली नाही. पहिल्या सराव लढतीत शमीनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा तसेच ऑफस्पिनर आर. अश्विनने प्रभावी मारा केला तरी अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि लेगस्पिनर राहुल चहरला प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजासह वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि वरुण चक्रवर्तीला संधी मिळू शकते.


ऑस्ट्रेलियानेही सराव सामन्यांत न्यूझीलंडला तीन विकेटनी हरवून विजयी सुरुवात केली. जोश इंग्लिसने शेवटच्या षटकात दोन चौकार ठोकल्याने त्यांचा विजय सुकर झाला. मात्र, अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला खाते उघडता आले नाही. परंतु, आघाडी फळीत माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथसह कर्णधार आरोन फिंच, मिचेल मार्श तसेच मधल्या फळीत अॅश्टन अॅगरने थोडा फार फलंदाजीचा सराव केला. गोलंदाजीत लेगस्पिनर अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसनने छाप पाडली. परंतु, मिचेल मार्श महागडा ठरला. भारताविरुद्ध कांगारू संघ व्यवस्थापन अन्य क्रिकेटपटूंना संधी देताना मुख्य फेरीत योग्य संघ निवडण्यादृष्टीने प्रयत्न करेल.



वेळ : दु. ३.३० वा.


इंग्लंडसह न्यूझीलंड चुका सुधारण्यास उत्सुक


सराव लढतींमध्ये बुधवारी होणाऱ्या आणखी एका सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने दोन्ही संघ चुका सुधारण्यास उत्सुक आहेत. सोमवारी इंग्लंडला भारताविरुद्ध तसेच ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पाहावा लागला. इंग्लंडची फलंदाजी बहरली तरी गोलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडची ढेपाळलेली बॅटिंग ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली. किवींच्या गोलंदाजांनी मॅचमध्ये रंगत आणली तरी तुलनेत कमी आव्हानामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

पाकिस्तान-द. आफ्रिका आमनेसामने


वेस्ट इंडिजची गाठ अफगाणिस्तानशी

सराव सामन्यांच्या सायंकाळच्या लढतींमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजची गाठ अफगाणिस्तानशी आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने चांगला सराव करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला ७ विकेटनी हरवले. द. आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ४१ धावांनी पराभव केला. दोन्ही लढतीत गोलंदाजांनी छाप पाडली. त्यामुळे बुधवारी पाकिस्तान आणि द. आफ्रिकेतील फलंदाजांच्या सरावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्यात अपेक्षित सराव न झाल्याने वेस्ट इंडिजचे फलंदाज निराश झालेत. त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध बॅटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी आहे.

वेळ : सायं. ७.३० वा.
Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र