राजकीय दबावामुळे आश्रय योजनेतील प्रस्ताव मागे


भाजपचा आक्षेप




मुंबई (प्रतिनिधी) : पुनर्विकासाच्या आश्रय योजनेअंतर्गत पालिकेतील सफाई कामगारांच्या माहिम आणि प्रभादेवी येथील वसाहतींचा प्रस्ताव बुधवारी प्रशासनाने स्थायी समितीतून मागे घेतला आहे. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. यात १२पैकी केवळ एक कंपनी मराठी होती. नेमका तोच प्रस्ताव प्रशासनाने मागे का घ्यावा, असा प्रश्न भाजपने विचारला आहे.


आश्रय योजनेअंतर्गत माहिम आणि प्रभादेवी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे कंत्राट बी.जी. शिर्के या कंपनीला देण्यात येणार होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. मात्र, या प्रस्तावातील त्रुटींवर आक्षेप घेत तो प्रस्ताव स्थायी समितीने पुन्हा प्रशासनाकडे पाठवला. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेवर भाजपने आक्षेप घेतला. प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी कोठतेही ठोस कारण दिले नाही. प्रशासकीय कारणामुळे प्रस्ताव मागे घेतला जात आहे असे सांगण्यात आले. यामुळे मराठी कंपनीचा प्रस्ताव मागे का घेतला जात आहे, त्याची ठोस कारणे देणे गरजेचे आहे, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.


तर केवळ शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे आयुक्तनि प्रस्ताव मागे घेतला असल्याचे भाजप प्रवक्ता, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. कारण यात केवळ एकच कंपनी ही मराठी होती आणि असे असताना ही कोणतेही कारण न देता हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.

Comments
Add Comment

'एक रुपयाही देऊ नका!'; महात्मा फुले जन आरोग्य योजनेवरून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा विधानसभेत शब्द

मुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या

नायगाव बीडीडी चाळीतील ८६४ कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण

- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वितरण; १६० चौ.फुटांच्या खोलीत आयुष्य काढलेल्यांना मिळाले ५०० चौ.फुटांचे

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम,

स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट गुण प्रणाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून पारदर्शक व सर्वसमावेशक

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई : राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू