राजकीय दबावामुळे आश्रय योजनेतील प्रस्ताव मागे


भाजपचा आक्षेप




मुंबई (प्रतिनिधी) : पुनर्विकासाच्या आश्रय योजनेअंतर्गत पालिकेतील सफाई कामगारांच्या माहिम आणि प्रभादेवी येथील वसाहतींचा प्रस्ताव बुधवारी प्रशासनाने स्थायी समितीतून मागे घेतला आहे. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. यात १२पैकी केवळ एक कंपनी मराठी होती. नेमका तोच प्रस्ताव प्रशासनाने मागे का घ्यावा, असा प्रश्न भाजपने विचारला आहे.


आश्रय योजनेअंतर्गत माहिम आणि प्रभादेवी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे कंत्राट बी.जी. शिर्के या कंपनीला देण्यात येणार होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. मात्र, या प्रस्तावातील त्रुटींवर आक्षेप घेत तो प्रस्ताव स्थायी समितीने पुन्हा प्रशासनाकडे पाठवला. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेवर भाजपने आक्षेप घेतला. प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी कोठतेही ठोस कारण दिले नाही. प्रशासकीय कारणामुळे प्रस्ताव मागे घेतला जात आहे असे सांगण्यात आले. यामुळे मराठी कंपनीचा प्रस्ताव मागे का घेतला जात आहे, त्याची ठोस कारणे देणे गरजेचे आहे, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.


तर केवळ शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे आयुक्तनि प्रस्ताव मागे घेतला असल्याचे भाजप प्रवक्ता, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. कारण यात केवळ एकच कंपनी ही मराठी होती आणि असे असताना ही कोणतेही कारण न देता हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.

Comments
Add Comment

‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा

मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५०

पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप)

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील