भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला

पुणे : हिंदुत्वाच्या मुद्दावर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची भेट घेत मनसेने भाजपसोबत जावे, असा सल्ला दिला होता. यावर राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला असून मनसेमुळे नुकसान होऊ शकते, असा इशाराही भाजपाला दिला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.


आरपीआय सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, असा इशारा रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.


दरम्यान आरपीआयला पुण्यात आणि मुंबईत महापौर पद मिळावे, अशी मागणी देखील आठवले यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत

मोबाईल हॅक करून एक लाख लुबाडले

अमरावती : खोलापूरहद्दीत म्हैसपूर येथील व्यक्तीचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बँकखात्यातून ऑनलाइन ९८ हजार ५००

खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमधील घातक घटकांच्या नियंत्रणासाठी धोरण आणणार

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई : विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध