भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला

पुणे : हिंदुत्वाच्या मुद्दावर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची भेट घेत मनसेने भाजपसोबत जावे, असा सल्ला दिला होता. यावर राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला असून मनसेमुळे नुकसान होऊ शकते, असा इशाराही भाजपाला दिला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.


आरपीआय सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, असा इशारा रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.


दरम्यान आरपीआयला पुण्यात आणि मुंबईत महापौर पद मिळावे, अशी मागणी देखील आठवले यांनी केली आहे.

Comments
Add Comment

baba adhav passed away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढावांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे : राज्यातील पुरोगामी चळवळीला आणि शेतकरी-कामगार वर्गाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा

जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा, मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

पुणे : 'इंडिगो' च्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा

राज्यातील ४९ लाख जमिनी अधिकृत होणार

नागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करत मुंबई, पुणे, नागपूरसह

'या' तारखेला १०३ वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडणार, कसं असेल मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक?

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जवळपास १०३ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिज अखेर

विधानपरिषद आणि विधानसभेचे तालिका अध्यक्ष जाहीर; ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : विधानपरिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर

वन विभागाचा मोठा निर्णय; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका नातलगाला मिळेल सरकारी नोकरी

मुंबई : महाराष्ट्रात मागील कही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. वाघांचे, बिबट्यांचे नागरिकांवर हल्ला