बीडमध्ये पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये पोहायला गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदावरी नदीमध्ये बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला.


ओंकार लक्ष्मण काळे (१६), शिव संतोष पिंगळे (१६) व तान्हाजी लिंबाजी आरबड (१७) असे मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. यातील ओंकार काळे आणि शिव पिंगळे हे दोघेही, पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही घटना काल सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.


तर, गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे सकाळी आठच्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेला तानाजी आरबड या तरुणाचा देखील गोदावरी नदीच्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. ३ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार