सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा


हायकमांडला पत्र लिहून कळवली नाराजी




मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकार परिषदा, सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडणारे व विरोधकांचे हल्ले परतावून लावणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.


काँग्रेसच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची फेररचना केली आहे. हे करताना अनेक पदाधिकारी बदलण्यात आले आहेत. माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये सचिन सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. नव्या बदलामुळे सावंत नाराज झाले आहेत.


परिणामी त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, असे पत्र त्यांनी काँग्रेस हायकमांडला लिहिले आहे. सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा टॅगही काढला आहे.

Comments
Add Comment

Metro : मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी

मुंबई : मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री

​PMMSY : मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा' योजनेला मुदतवाढ

नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि 'नील क्रांती' अधिक प्रभावीपणे

Nitesh Rane PC : महिला आरक्षण विधेयकामुळे विरोधकांचा खरा चेहरा समोर आला

मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड केला असून,

केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक

Biogas : प्रत्येक जिल्ह्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, राज्याकडून ५०० कोटींच्या तरतुदीसह हरित ऊर्जेला बळ

मुंबई : राज्यातील वाढत्या शहरीकरणासोबत निर्माण होणारी कचऱ्याची समस्या आता रोजगाराची आणि स्वच्छ ऊर्जेची संधी

Maharashtra : महाराष्ट्रात ₹२.५६ लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹२,५६,१३७.०१